एका सागराची कथा...

एका सागराची कथा...

एकदा काय झालं,
एक सरिता रागवली
आपल्या boyfriend ला म्हणाली
'हे रे काय सागर !
मीच का म्हणून ?
दर वेळी मीच का
मीच का यायचं खाली डोंगरावरून ?

आणायचं राना वनातलं सारं तुझ्यासाठी
दरी बघायची नाही
कडा बघायचा नाही
कशी सुसाट पळत येते मी
विरहव्याकुळ, संगमोत्सुक
कधी एकदा तुला गच्च मिठी मारीन
तुझ्यात हरवून , हरपून जाईन
आणि तू वेडातुझं लक्षच नसतं कधी
सारखा त्या चंद्रिकेकडे टक लावून असतोस.

उसळतोस तिच्यासाठी
तुझ्यासाठी पाणी आणते मी
पण तुला भरती येते तिच्यासाठी
मी नाही जा !
बोलणारच नाही आता.
येणारही नाही.

काठावरच्या लोकांना सांगून
मोट्ठं धरण बांधीनथांबून राहीन तिथेच.
बघच मग. सरिताच ती
बोलल्याप्रमाणे वागली.
सागर बिचारा तडफ़डला
आकसला, आतल्या आत झुरत गेला.

शेवटी फ़ुट्ला बांध त्याच्याही संयमाचा
उठला ताडओरडला दहाडउफ़ाळला
वारा पिऊनलाटांचं तांड्व घेऊन
सुटला सुसाटसरितेच्या दिशेने.

लोक येडे.
म्हणाले 'सुनामी आली ! सुनामी आली !!'

1 comment:

  1. Hiiiiiiiiii

    This poem Very Nice and Amazing.

    Look this poem who is in LOVE.

    Reg.

    Ranjit
    Successful Rahurikar.

    ReplyDelete