आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

इन्द्र्धनुष्याचे रंग आहेत आणि पारिजातकाचा वास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे
मी म्हणजे जीवन आणि तु म्हणजे श्वास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे
संकटांची नाही भिती, तुझ्या मैत्रीचा विश्वास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे
कधी वाटते फक्त तुझी मैत्री सच्ची, बाकी दुनिया नुसता आभास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे
हवे काय अजुनि त्याला, मित्र तुझ्यासम ज्यास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे
ओढ तुझ्या सावलीची माझिया रस्त्यास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे
असो वा नसो कुणी आपल्या संगे, पर्वा त्याची कुणास आहे
आपल्या मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास आहे
माझ्या चुकांवरही मित्रा पांघरूण तुझे हमखास आहे
आपल्या मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास आहे
तुझ्याबरोबर ऐन उन्हाळा ही मजला मधुमास आहे
आपल्या मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास आहे
आयुष्याच्या पटलावरती तुझ्या मैत्रीची आरास आहे
आपल्या मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास आहे
आपल्यात कधी निखळ चर्चा, आणि कधितरी उपहास आहे
आपल्या मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास आहे

ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात....

ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात....
मी बोलतच नाहीडोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात....
तिला कळतच नाहीतिच्याकडे पाहिलं की पाहतच राहतो...
स्तब्ध होऊनतिच्याकड नाही पाहिलं की तीच निघून जाते...
क्षुब्ध होऊनचंद्र तारे तोडून तिला आणून द्यायचं मनात येतं
पण हे शक्य नाही हेही लगेच ध्यानात येत
मग मी माझी इच्छा फुलावरच भागवतो
बुकेही नाहीच परवडत हाही हिशेब आठवतो
पण फुल तिला द्यायची हिम्मतच होत नाही
बोलणच काय, तेव्हा तिच्या बाजुलाही फिरकत नाही
मग एखाद्या जाड पुस्तकात फुल तसच सुकत जातं
सगळी तयारी सगळी हिम्मत नेहमी असंच फुकट जातं
काही केल्या तिच्या मनाचा थांगपत्ता लागत नाही
माझं मन तिच्याशिवाय काहिसुद्धा मागत नाही
ती नाही म्हणेल याची भीती वाटते
ती नाही म्हणेल याची भीती वाटते
पण तरीही आज ठरवलंय तिला सांगायचं
तिच्यसाठी असलेलं आयुष्य तिच्याच स्वाधीन करायचं
कुणास ठाऊक?तिच्याही एखाद्या पुस्तकात
माझ्यासाठीची सुकलेली फुलं असतील.

आता साध्या सरळ आयुष्यात फारच गडबड झाली आहे

आता साध्या सरळ आयुष्यात फारच गडबड झाली आहे
काय सांगू मित्रांनो, मझ्या मनात एक मुलगी भरली आहे

आधी सिगारेट ''दैनिक सकाळ'' होती
आणि अंघोळ ''विकली ईलस्ट्रेटेड'' होती
दाढी पण फक्त आमवस्येलाच गायब होत होती
लाईफ कशी एकदम कूल मध्ये चालली होती

सिगारेट माझी आता सुटली आहे
अंघोळ रोज दोनदा घडू लागली आहे
मोलिव्ह शेवचा मुहुर्त अमावस्येएवजी सूर्यास्त झाला आहे
लाईफ मध्ये कसा एकदम एंथू आला आहे

साध्या सरळ आयुष्यात फारच गडबड झाली आहे
काय सांगू मित्रांनो माझ्या मनात एक मुलगी भरली आहे

दिसली पोरगी, मार शिट्टि भेटला चम्या,
उडव खिल्ली वेळ मिळाला तर कर भंकसगिरी
एकूण काय तर, आदर्श अशी जीवन पद्धती होती

पोरगी दिसल्यावर आता शिट्टी वाजत नाही
चम्या लोकांची खिल्ली, हल्ली आपण उडवत नाही
भंकसगिरी तर पुर्ण विसरलो एकूण काय तर,
आपण आता जेंटलमन झालो

साध्या सरळ आयुष्यात फारच गडबड झाली आहे
काय सांगू मित्रांनो माझ्या मनात एक मुलगी भरली आहे

पिक्चर पहायचा? ''नील'' कमल पाहू
भुक लागली आहे? वडा पाव मारु
शर्ट कोणता घालायचा? लाल भडक एकदम फंडू
हेयर स्टाईल कशी करायची? छोड यार टक्कलच करु
आता मात्र रोज ''RHTDM'' ची पारायणे करतो आहे
काटा चमचा वापरून पीज्झा खायला शिकतो आहे

इस्त्रि केलेला फॉर्मल शर्ट, पॅंटमध्ये व्यवस्थीत इन करतो
तेल लाऊन केसाला, कोंबडा काढुन भांग पाडतो

साध्या सरळ आयुष्यात फारच गडबड झाली आहे
काय सांगू मित्रांनो माझ्या मनात एक मुलगी भरली आहे

नशीब खुलले, भाग्य फळफळले, ग्रॅंड लॉटरी लागली
तिच्या कडून कॉफी प्यायची मला चक्क ऑफर आली
वाटले कष्ट आपले सार्थकी लागले
''खयालो की राणी'', ''बहारो की मलीका'' चे हृदय आपण जिंकले

भेटताच कँटीनमध्ये तिने मस्त क्लोज अप स्माईल दिले
दोन कॉफी ऑर्डर करुन.. मग माझ्याकडे पाहिले
''तुला काही सांगायचे आहे'', ती बोलली लाजत
'' मला तर सगळं आधिच कळले'' मी म्हणालो हसत

ईश्श... अशक्यपणे बोलली
ती गालावर खळी पाडून मला तर वाटले
माझे शुभमंगलच गेले आटपुन
''तुझा दादा मला आवडतो हे तुला कसे कळले?''...............................
एकून हे कानच काय, माझे हृदय सुद्धा फाटले

साध्या सरळ आयुष्यातली गडबड आता संपली आहे
इथून दूर कलकत्याला- दादा वहिनी मजेत आहेत.

कधीतरी अशीच एक संध्याकाळ असेल...

कधीतरी अशीच एक संध्याकाळ असेल,
ह्रदयात तूझी प्रीत अन ओठावर गीत असेल...
सगळया आठवणी क्षणात डोळयासमोरून जातील,
नकळत मग गालावर या थेंब ओघळतील...

कधीतरी पून्हा तू स्वप्नात येशील,
एकत्र घालवलेले क्षण आठवतील...
तूझ्याशिवाय आता मला जगावं लागेल,
जगतानाही रोज असं मरावं लागेल...

कधीतरी तू ही माझी आठवण काढशील,
प्रीत आठवून मझी कंठ तूझाही दाटेल..
डोळ्यातील अश्रू मूक पणे गिळून टाकशील,
कारण पूसायला तेंव्हा ते मी जवळ नसेन...

कधीतरी असा एक दिवस येइल,
प्रेमापोटी मझ्या तू परत येशील...
पण तेंव्हा या प्रेमाला अर्थ नसेल,
कारण तेंव्हा मी या जगीच नसेन...

कधीतरी मग या मनालाही समजेल,
तूझ्या परतीची अशा तेंव्हा मावळेल...
त्यावेळेस जीवनाला या अर्थ नसेल,
कारण शरीराला तेंव्हा या मनंच नसेल...

कधीतरी तू मला असं वचन देशील ?
पूढच्या जन्मी तरी माझी होशील ?
मग तू सोडून गेल्याचं दुःख नसेल,
आपण कोणावर तरी प्रेम करू शकलोयातच मग मला समाधान असेल...

बघ माझी आठवण येते का.....?

सये....
आता तुझा प्रत्येक क्षण माझ्या अस्तित्वापासुन दुर असेल..
वर वर तु निच्छित असशील... मनात मात्र दुःखांचा पुर असेल !
काही दिवसांनंतर हा पुर ओसरेल...
कुठल्यातरी बेसावध क्षणी... पुन्हा पाऊल घसरेल..
पुन्हा कोणीतरी आवडू लागेल... पुन्हा डोळे झुरतील..
मनात मात्र तुझ्या तेव्हा...माझेच उसासे असतील..
वाट बघ... प्रेमाची भावना उफ़ाळून येते का..?
त्या क्षणी नकळत का होईना ... बघ माझी आठवण येते का?

किंवा कदाचित असंही होईल... तुला एखाद स्थळ सांगुन येईल..
दोन्ही घरची बोलनी होतिल... दोन्हीकडून होकार असेल..
घरात जरी 'हो' म्हटलस तरी... मनात तुझ्या 'नकार' असेल..
पुन्हा मन दुबळ होईल... स्वतःची बाजू मांडायला..
अपयशी ठरलं म्हणुन वेडं...तुझ्याशीच लागेल भांडायला..
भांडण मिटेपर्यंत कदाचित... अंगावरती हळद चढेल..
आपण नक्की काय करतोय? तुझ्या मनाला कोडं पडेल..
सनईच्या सुरावर, वाजत्रांच्या तालावर.. नव्या घरात प्रवेश होईल..
क्लेश होऊ देऊ नकोस..असेल त्याचा स्विकार कर..
तुझ्यावर आता जवाबदारी आहे.. याचाही तेव्हा विचार कर..
अंगावरची हळद आता बघ हळूह्ळू उतरते का?
पिवळ्या पाण्याकडे लक्ष गेल तर बघ.. माझी आठवण येते का?

दिवसामागून दिवस सरतील.. वर्षामागून वर्षे जातील..
नव्या आयुष्यामध्ये पुन्हा... नवी नाती निर्माण होतील..
नव्या नात्यांच्या नव्यापणात... आपले नाते जुणं होईल..
नात्याप्रमाणेच हळूहळू... मनसुद्धा सुनं होईल..
माझ्या सुन्या मनात मात्र... फ़क्त तुच उरशील..
माझ्यासारखीच.. एकदिवस तू सुद्धा झुरशील..
बघ.. एखादी पाऊलवाट तुला..माझ्या आठवणींकडे नेते काय?
बघ.. सुकल्या झाडाला पुन्हा.. नव्याने पालवी फ़ुटते काय?
आयुष्यात आतापर्यंत निदान... निखळ 'मैत्री' तरी उरते काय?
आणि आयुष्यात... एकदातरी .. बघ माझी आठवण येते का.....?