कार्ट प्रेमात पड़लय

कार्ट प्रेमात पड़लय
हळूच हसतय
कधी कधी रुस्तय
जेवताना उठतय
ग्यालरित बसतय
विचारात असतय
गुपचुप हस्तय
चोरून बोलतय
बाहेर जातय
उशिरा येतय
टेंशन घेतय
पैशाची उधल पट्टी करतय
घरी नीट बोलना
रस्त्याना नीट चालना
सुट्टीत घरी थामबना
रात्रभर एस एम एस करतय
मोबाइल कुनाकड़ देईना
बाथरूम मधे पण मोबाइल घेउन जातय
एस एम एस पण लोक़ करून टाकतय
लग्नाचा विषय काढला की भांडंन काढतय
फोन रिसीव केला तर शिव्याच घालतय
आपण जवळ गेलो की फ़ोन कट करतय
कुणाचा फ़ोन आला की लांब जाऊंन बोलतय
वरील लक्षण दिसली की समजायच कार्ट प्रेमात पड़लय

मनाला एकदा आसेच विचारले

मनाला एकदा आसेच विचारले
का इतका तिच्यात गुंततो ?
नाही ना ती आपल्यासाठी
मग का तिच्यासाठी झुरतो ?

कळत नाही तुला
त्रास मला भोगावा लागतो
आश्रूं मधे भिजून भिजून
रात्र मी जागतो.

मी म्हटले मनाला
का स्वप्नात रमतो ?
तिच्या सुखा साठी तू
का असा दुखात राहतो ?

मन म्हणाले
प्रेम तेव्हा सुरू होते जेव्हा
आपण स्वता ला विसरतो
सार काही तिच्यासाठी
ईतकेच मनाला समजावतो.

मी खरेच तू सांगितलेले काम करतोय.....




मी खरेच तू सांगितलेले काम करतोय.....
मला परमेश्वर भेटला
मी त्याला सहजंच विचारलं
तु सगळ्यात चांगली गोष्ट कुठली बनवलीस ?
माणसाचे मन

आणि सगळ्यात वाईट गोष्ट ?
माणसाचे मन,

बाप्पा मला पुढे म्हणाला.....
ऐक, मी एक कुबेर बनवला होता...
त्याच्याकडे जगातली सगळ्यात जास्त संपत्ती होती, पैशाची.
मी तुला बनवला अन आता तुझ्याही वाट्याला संपत्ती येतीये, माणसांची..........
लक्षात ठेव, एक माणूस हा कुबेराच्या संपत्तीच्या दसपट मोलाचा असतो...........
मनं जप, मनं जोड, माणसं मिळव.......
विचार कर.........."

तेंव्हापासून हे वेड लागलंय...........
आज एक एक करुन मोती जुळवतोय, माणसं जोडतोय,
खरेच पुन्हा कधी बाप्पा भेटला तर त्याला सांगण्यासाठी,
की मी खरेच तू सांगितलेले काम करतोय.....

तिला वाटतं दरवेळी मीच चुकतो

तिला वाटतं दरवेळी मीच चुकतो
कारण बोलताना कदाचित मीच तिला hurt करून जातो
एवढ्याश्या नाकावर येतो केवढाला राग
नि तिचा चेहरा पडतो !
आणि माझ्या मनात मोठ्ठा ढग गडगडतो !!
पुढचं काय ठरलेलेच असतं
चार दिवस अबोला, नंतर आपणच जाऊन गोड बोला!!!
चूक तिची असो व माझी sorry मात्र मीच म्हणायचं !!!!
मग तीन पण जरा हसत हसत असं नै तसं, तसं नै असं
असं सांगायचं .
मग मी पण 'असं असं' करायचं
मैत्रीत कधीतरी आसवं आणि नंतर हसं असं चालायचंच !!

चुकून कधीतरी चुकीचे शब्द बाहेर पडतात.
मनं दुखावतात.
आणि टचकन डोळ्यात पाणी येतं.
पापण्या पाणावतात.
त्या रात्री दोन्हीकडच्या उषा भिजतात.
उर उसासतात.
घड्याळातले काटे सरकता सरकत नसतात.
वहीची पानं पलटता पलटत नसतात.
पिंपळाची सुकलेली पानं मात्र ,अजूनही
आठवणी ताज्या ठेवून वहीत तशीच बंदिस्त असतात !!

त्या काळ्या शांततेत डोक्यात मात्र घुमत असतात
असंख्य विचारांचे आवाज.
जगजीत सिंगच्या गजल आणि आर .डी .ची sad songs
ऐकत रात्र कशीतरी सारून जाते.

दुसऱ्या दिवशी मीच तिच्याकडं बघतो.
मी मात्र तिच्यासाठी एक अनोळखी असतो.
तिचे निःशब्द ओठ आणि शांत डोळे बरंच
काही सांगून जातात !

आता पुन्हा असतो काही दिवस अबोला .....!!!!

प्रेम म्हणजे काय हे कधी कुणाला कळलेच नाही

प्रेम म्हणजे काय हे कधी कुणाला कळलेच नाही
छोटे से कोड ते, पण कधी कुणाला उलगडलच नाही…
 
का जीव होतो वेडा पिसा जेव्हा येते तिची आठवन
हृदयात केलेली असते तिच्या छोट्या छोट्या गोष्टींची साठवण…
 
मनाला तिच्या शिवाय काही दुसरे सुचत नाही
पण तिच्या शिवाय दुसरा कुठला विचार करावा असेही कधी वाटत नाही…
 
रात्री छान च असतात … तिच्या स्वप्नानी भरलेल्या
देऊन जातात उभारी … मनातल्या त्या प्रेमाच्या अंकुराला…
 
प्रेम कधी सफल होते तर कधी नाही… ते जीवनात कधी ही सब कूच नसत
पण तरीही हृदयाच्या कुठल्या तरी कोपर्‍यात ते नेहमीच जपायाच असत…
 
प्रेमाचे हे कोड कदाचित कधी च कुणाला उलगडणार नाही …
पण त्या साठी हे जग प्रेम करायचे ही कधी थांबणार नाही