हिरव्या श्रावणातली मेंदी.. आणखीनच रंगत जाते.....!

मैत्री म्हणजे एकमेकांना समजणं.. आणि समजावणं असतं.....

मैत्री म्हणजे... कधी कधी स्वताःलाच आजमावणं असतं .....



घट्ट लावलेलं मनाचं दार.. मैत्रीत अलगद उघड्तं....

हळव्या मनात जपलेलं 'अलगुज' अवचित ओठांवर येतं......



मैत्री मधुनच जन्म घेतं.. निखळ प्रेमाचं रोपटं.....

प्रेम ! परमेश्वरानं माणसाला दिलेली... सर्वात सुंदर गोश्ट !......



मित्राचा 'सखा' आणि मैत्रीणीची 'सखी'......

मैत्रीतुनच फ़ुलतात नाती.... फ़ुलपाखरासारखी........



इन्द्रधनुश्यी रंग लेवुन.. फ़ुलपाखरु आकाशात झेपावते.....

हिरव्या श्रावणातली मेंदी.. आणखीनच रंगत जाते.....!

असाच आज विचार करत बसलो माझ्या आजवरच्या जीवनाचा

असाच आज विचार करत बसलो
माझ्या आजवरच्या जीवनाचा
गोळाबेरीज मांडायला बसलो
माझ्याच आयुष्यातील शब्दफुलांचा
...बेरजेत सगळे माझ्या गोळेच गोळे आले
...कसेही सोडवले तरी,गणित माझे उणेच आले
...करू तरी काय मी,माझी काय चुक
...प्रत्येक गोष्टीला आज इथे एक नवा लुक

काल जे सोपे होते,तेच आज कठीण झाले
कठीण का झाले शोधता शोधता
आयुष्य माझे शून्य झाले.....
कळले जेव्हा शून्यातच धावतोय
अर्थच माझ्या जीवनाचे सारे तेव्हा अर्थहीन झाले
...उपदेशांच्या भडिमारांचा पिरयामिड रचला लोकांनी
...शपथेवर मला आणि अपेक्षांनाही जगवला लोकांनी
...पण साला पिरयामिड पत्त्यांचाच डोलारा निघाला
...माझ्याच खांद्यावर अपेक्षांचा तेव्हा छानपैकी'जनाजा'निघाला...
पण मित्रांनो,
तेव्हाही तिथे एक कुणीतरी नाचत होत
माझ्याच नावाने मनापासून साखर कुणी वाटत होतं
पालवीच्या पानांमागे चंद्र जेव्हा लपत होता
माझ्यासाठी कुणीतरी तेव्हा तीळ तीळ मरत होतं
...मग कळले तेव्हा मला,गणितात मी मध्यात होतो
...काही उण्या अंकाचीच बेरीज मी करत होतो
...मग म्हटले जाउदे साला,पेपरच कठीण आहे
...अजून बराच वेळ आहे,आपल्याला कुठे घाई आहे
आता मात्र ठरवलयं मी हसतच जगणार
मीही आता मनाने कुणासाठी साखर वाटणार
अश्यामध्येच मित्रांनो एक फायदा असतो
आपलं झाकून मनामध्येच सारया जगाला हसवण्याचा आनंद असतो....

तुझी साथ हवी होती मला आयुष्यात

तुझी साथ हवी होती मला आयुष्यात
खूप स्वप्न पहिली त्यासाठी
पण डोळे उघडले आणि स्वप्ने तुटली
नेहमी असेच का होते
स्वप्न हे स्वप्नच बनून का राहते

स्वप्नांना सत्याची जोड का नसते
जे काही असते ते सगळे खोटे असते
कारण स्वप्न हे स्वप्न असते
त्यात काही सत्य नसते

प्रेम माझे खरे होते तुझ्यावर
पण नाही सांगू शकली कधी तुला
कारण तेव्हा मी स्वप्नांच्या दुनियेत
तुझ्याबरोबर रमत होती

आज त्या गोष्टीला खूप उशीर झाला आहे
हातातून सगळ्या गोष्टी निसटून गेल्या आहेत
तरीही मी अजून स्वप्नांच्याच दुनियेत आहे
कारण जे सुख सत्यात नाही
ते स्वप्नात आहे