नटून थटून आली जेव्हा ती बेस्ट बसमधून...

नटून थटून आली जेव्हा ती बेस्ट बसमधून…
काय सांगू मित्रांनो पोरीने नेलं काळीज चोरून!!

पाहताच तिला मी एकदम क्लीन बोल्ड झालो…
एप्रिल च्या कडकडीत दुपारी आय ऍम सो कोल्ड झालो!
भूक हरवली, झोप उडाली झालो दिवाना तिज पाहून…
काय सांगू मित्रांनो पोरीने नेलं काळीज चोरून!!

व्हॅलेंटाइन्सला ठरवलं, तिला सांगू मनातली गोष्ट…
पण दुर्भाग्य माझं असं की तिचे भाऊ होते फार धष्टपुष्ट!
गोष्ट राहिली बाजूलाच, आणि आलो मी हनुमान होऊन…
काय सांगू मित्रांनो पोरीने नेलं काळीज चोरून!!

मी ही हार मानणारा नव्हतो म्हटलं शोधू नवा मार्ग…
तडक जाऊन मग शोधून काढला मी एफवायबीएससी चा वर्ग!
जे काही पाहिले ते पाहतंच राहिलो डोळे विस्फारून…
काय सांगू मित्रांनो पोरीने नेलं काळीज चोरून!!

विश्वास बसता बसेना की ती वर्गासमोर उभी होती…
एफवाय च्या वर्गाला ती ‘सी प्रोग्रॅमिंग’ शिकवत होती!
जिच्यावर लाईन मारत होतो आलो तिलाच मॅडम म्हणून…
काय सांगू मित्रांनो पोरीने नेलं होतं काळीज चोरून!!

कुणाच्या इतक्याही जवळ जावू नये की...

कुणाच्या इतक्याही जवळ जावू नये
की आपल्याला त्याची सवय व्हावी
तडकलेच जर ह्रुदय कधी
जोडताना असह्य वेदना व्हावी

डायरीत कुणाचे नाव इतकीही येऊ नये
की पानांना ते नाव जड व्हावे
एक दिवस अचानक त्या नावाचे
डायरीत येणे बन्द व्हावे

स्वप्नात कुणाला असेहि बघु नये
की आधाराला त्याचे हात असावे
तुटलेच जर स्वप्न अचानक
हातात आपल्या काहिच नसावे

कुणाला इतकाही वेळ देऊ नये
की आपल्या क्षणाक्षणावर त्याचा अधिकार व्हावा
एक दिवस आरशासमोर आपनास
आपलाच चेहरा परका व्हावा

कुणाची इतकीही ओढ नसावी
की पदोपदि आपण त्याची वाट बघावी
आणि त्याची वात बघता बघता
आपलीच वाट दीशाहीन व्हावी

कुणाचे इतकेही ऐकू नये
की कानात त्याच्याच शब्दांचा घुमजाव व्हावा
आपल्या ओठांतुनही मग
त्याच्याच शब्दांचा ऊच्चार व्हावा

कुणाची अशीही सोबत असू नये
की प्रत्येक स्पंदनात ती जाणवावी
ती साथ गमवण्याच्या केवळ भीतीने
डोळ्यात खळकन अश्रु जमावेत

कुणाला इतकीही माझी म्हनू नये
की त्याचे मीपण आपन विसरून जावे
त्या संभ्रमात त्याने आपल्याला
ठेच देऊन जागे करावे

हसतील ना कुसूमे जरी

हसतील ना कुसूमे जरी
ना जरी म्हनतील 'ये'
पाऊल ना टाकू तिथे
बाग ती आमूची नव्हे
भ्रमरा परी सौन्दर्य वेडे
आहो जरी ऐसे अम्ही
इश्कातही नाही कुठे
भिक्शुकी केली अम्ही

खेळलो इश्कात आम्ही
बेधून्द् आम्ही खेळलो
लोळलो मस्तीत नाही
पायी कूनाच्या लोळलो
अस्मिता इश्कात सा-या
केव्हान्च नाही विसरलो
आली तशीही वेळ तेव्हा
इश्क सारा विसरलो

रडलो आम्ही इश्कात
जेव्हा आम्हा रडावेसे वाटले
तेव्हा नव्हे जेव्हा इश्कास वाटले
आसूवरी अधिकार हाही
इश्कात ज्याला साधला
नुसताच नाही इश्क
त्याला मो़क्ष आहे साधला

बर्बादिची दीक्षा जशी
इश्कात आम्ही घेतली
इश्कही बर्बाद करण्या
माघार नाही घेतली
ना रडू नुसतेच आम्ही
हाय ना नुसते करु
आहो शिवाचे भक्त आम्ही
हेही करु तेही करु..........

शहर की इस दौङ मे दौङ के करना क्या है?

लगे रहो........मधिल या डायलॉगवर मी फिदा झालो.

=?=?=?=?निलेश=?=?=?=?

शहर की इस दौङ मे दौङ के करना क्या है?
जब यही जीना है दोस्तो तो फिर मरना क्या है?

पहली बरिश मे ट्रैन लेट होने की फ़िक्र है
भूल गये भीग्ते हुए टहलना क्या है?

सीरिअल्स् के किरदारो का सारा हाल है मालूम
पर मा का हाल पुछ्ने की फ़ुर्सत कहा है?

अब रेत पे नन्गे पाव टहल्ते क्यू नही?
108 है चैनल फिर दिल बहल्ते क्यू नही?

इन्टरनेट से दुनिया के तो टच् मे है,
लेकिन पङोस मे कौन रहता है जान्ते तक नही.

मोबाइल, लॅन्डलाईन सब की भरमार है,
लेकिन जिगरी दोस्त तक पहुचे ऐसी तार कहा है?

कब डुबते हुए सुरज को देखा था, याद् है?
कब जाना था शाम का गुज़रना क्या है?

तो दोस्तो शहर की इस दौड् मे दौड् के करना क्या है
जब यही जीना है तो फिर् मरना क्या है?

एका सागराची कथा...

एका सागराची कथा...

एकदा काय झालं,
एक सरिता रागवली
आपल्या boyfriend ला म्हणाली
'हे रे काय सागर !
मीच का म्हणून ?
दर वेळी मीच का
मीच का यायचं खाली डोंगरावरून ?

आणायचं राना वनातलं सारं तुझ्यासाठी
दरी बघायची नाही
कडा बघायचा नाही
कशी सुसाट पळत येते मी
विरहव्याकुळ, संगमोत्सुक
कधी एकदा तुला गच्च मिठी मारीन
तुझ्यात हरवून , हरपून जाईन
आणि तू वेडातुझं लक्षच नसतं कधी
सारखा त्या चंद्रिकेकडे टक लावून असतोस.

उसळतोस तिच्यासाठी
तुझ्यासाठी पाणी आणते मी
पण तुला भरती येते तिच्यासाठी
मी नाही जा !
बोलणारच नाही आता.
येणारही नाही.

काठावरच्या लोकांना सांगून
मोट्ठं धरण बांधीनथांबून राहीन तिथेच.
बघच मग. सरिताच ती
बोलल्याप्रमाणे वागली.
सागर बिचारा तडफ़डला
आकसला, आतल्या आत झुरत गेला.

शेवटी फ़ुट्ला बांध त्याच्याही संयमाचा
उठला ताडओरडला दहाडउफ़ाळला
वारा पिऊनलाटांचं तांड्व घेऊन
सुटला सुसाटसरितेच्या दिशेने.

लोक येडे.
म्हणाले 'सुनामी आली ! सुनामी आली !!'

आठवण आली तुझी की..............

आठवण आली तुझी की,
नकळत डोळ्यांत पाणी येतं..
मग आठवतात ते दिवस
जिथं आपली ओळख झाली..
आठवण आली तुझी की,
माझं मन कासाविस होतं
मग त्याच आठवणीना..
मनात घोळवावं लागतं..
आठवण आली तुझी की,
वाटतं एकदाच तुला पाहावं
अन माझ्या ह्रदयात सामावुन घ्यावं..
पण सलतं मनात ते दुःख..
जाणवतं आहे ते अशक्य...
कारण देवानेच नेलयं माझं ते सौख्य...
पण तरिही.........
आठवण आली तुझी की,
देवालाच मागतो मी....
नाही जमलं जे या जन्मी
मिळू देत ते पुढच्या जन्मी....

मी मराठी माणुस

कधीच भूकेपोटी पाठीत वाकलो नाही मी
कधीच लाचारांच्या पंगतीत बसलो नाही मी
अंधार उजळण्यासाठी शब्दांच्या ज्योती झालो मी
अन कधीच आभासांच्या वार्‍याने विझलो नाही मी ...........

आई

आई
दिवसभर कितीही दंगा केला
तरी मला थोपटल्याशिवाय आई कधी झोपली नाही
घरापासुन दूर आता म्हणूनच कदाचित
शांत झोप कधी लागली नाही

कुणी विचारतं .."तुला घरी जावसं वाटत नाही?
"कसं सांगू त्यांना, घरातून निघताना
आईला मारलेली मिठी सोडवत नाहीआई,

तू सांगायची गरज नाही
तुला माझी आठवण येते
आता माझ्यासाठि डबा करायचा नसतो
तरीहि तू सहा वाजताच उठतेस

तुझ्या हातचा चहा
तुझ्या हातची पोळी
तुझ्या हातची माझी नावडती भाजीही खायला
आता जीभ आसुसली

घरापासून दूर ...
आई जग खूप वेगळं आहे
तुझ्या सावलीत अगदी बिंनधास्त होते
आता रणरणंत ऊन आहे

तू आपल्या पिलांसाठी
सगळं केलंस ...
एक दिवस पिलं म्हणाली, "आई आता आम्हाला जायचंय" ...
आणि तू त्यांना जाऊ दिलंस

आई,
तू इथे नाहीस
बाकी माझ्याकडे सगळं आहे
घरापासून दूरजग खूप वेगळं आह....................

फोन नामक यंत्र - मन व्यक्त करण्याचं तंत्र

फोन नामक यंत्र - मन व्यक्त करण्याचं तंत्र

भेटुन बोलण्यासारखं खुप काही
एवढं करायचं साहस मात्र नाही

अशा वेळी जवळ हवंफोन नामक यंत्र -गवसतं
जिथे माणसाला मन व्यक्त करण्याचं तंत्र
फोन-ओ-फ्रेंड म्हणता म्हणताती गर्लफ्रेंड त्याची बनली!

फोनवरच तिने त्याचीभावना होती जाणली !!
कामासाठी घेतलेला फोन कधी गरज होऊन बसतो
बिलाच्या रकमेचा आकडामग आपल्याकडे पाहुन हसतो !

तरी या फोनचे डोहाळे आपण हसत-हसत सोसतो !!