आमच्याकडे याला प्रेम म्हणतात ...


प्रेम करायला लागतंय काय
सुंदर एक मुलगी आणखी काय
" मन जुळाव लागत " ... अहो काही काय
घ्या आणि द्या ... हाच सरळ न्याय

वेळ मिळाला तर बाकीच्या गोष्टी
भावनांचाही थोड नंतर बघुयात
कुणी आता काहीही बोलू देत
आमच्याकडे याला प्रेम म्हणतात
स्पष्टच बोलली माझी आई
जातीतलीच  बघ माझे बाई
नोकरी - धंदा बघून घे सगळ
प्रेमात करशील उगीच घाई

मीही अगदी तसच केल
कोण पडतंय नसत्या फंदात
कुणी आता काहीही बोलू देत
आमच्याकडे याला प्रेम म्हणतात ...

प्रेम केल आम्ही दिमाखान सांगणार
प्रेमाच्या आणाभाका आम्हीच भाकणार
जमल तर ठीक नाहीतर दुसर बघणार
आतल्या या गोष्टी कुणाला कळणार

प्रेमाचा बाजार आणि प्रेमाचा व्यापार
कोण कधी तोट्यात ... कोण फायद्यात
कुणी आता काहीही बोलू देत
आमच्याकडे याला प्रेम म्हणतात ...

एकच प्याला आज रिता झाला

करतो आयुष्याचे आज मोजमाप
कधी केलं पुण्य कधी केलं पाप
सांगण्यासारखं तुम्हाला आहे अमाप
एकच प्याला आज रिता झाला॥१॥
करितो बालपणापासुन सुरुवात
निरागसता कुटुन भरली त्यात
ती शोधण्या गेली सारी हयात
एकच प्याला आज रिता झाला॥२॥
निरागस चेहर्यात होता खट्याळपणा
वागण्यात होता माझ्या खोड्याळपणा
सगळे म्हणायचे पुरे तुझा नाठाळपणा
एकच प्याला आज रिता झाला॥३॥
वर्गात पहिला नंबर येण्याची
असे कायम इच्छा आईबाबांची
साथीला होती त्यांच्या, नेहमी छडी वेताची
एकच प्याला आज रिता झाला॥४॥
एकीकडे त्यांचा असायचा तो अट्टाहास
मी कसा बसा व्हायचो काठावर पास
त्या दिवसा पुरता घडायचा उपवास
एकच प्याला आज रिता झाला॥५॥
एकदा नमिला मी धाडलं लव-लेटर
तिच्या बापाचा मार पडला लेटर
नमि म्हणाली, "ट्राय अगेन लेटर"
एकच प्याला आज रिता झाला॥६॥
नमि गेली शाळा सोडून दुसर्या गावात
चावट आठवणी तरळल्या डोळ्यात
सारं काही माफ असतं त्या कच्च्या वयात
एकच प्याला आज रिता झाला॥७॥
 
धडपडत ठेचकाळत थोडा मोठा झालो
स्पर्धेच्या युगात लढाई लढुन आलो
यशापयशाची गोळा-बेरीज करुन आलो
एकच प्याला आज रिता झाला॥८॥
कॉलेजमधे कट्ट्यावर असायचो चारचौघात
शिट्या मारणे,छेड काढणे व्हायचेच ओघात
त्याच नादात पडलो एकदोघींच्या प्रेमात
एकच प्याला आज रिता झाला॥९॥
भाईगिरीची चुणुक दाखवायचो उत्साहात
पोरींवर इंप्रेशन मारायचो दिमाखात
एखादी खायचो ही कानशिलात
एकच प्याला आज रिता झाला॥१०॥
आयुष्यात एका वळणावर थांबलो
वाटले इथपर्यंत विनाकारण रांगलो
अरे माझ्या अस्तित्वासाठी झुंजलो
एकच प्याला आज रिता झाला॥११॥
आता स्पर्धा संपली प्रगतीपुस्तकाची
चढाओढ सुरु झाली अस्तित्वाची
किंमत कळली तेव्हा आयुष्याची
एकच प्याला आज रिता झाला॥१२॥
खुप झगडुन मनासारखं काम सुरु झालं
मग माझं बस्तान निट बसु लागलं
आई-वडिलांच्या संस्कारांच आज चिज झालं
एकच प्याला आज रिता झाला॥१३॥
खुप झगडुन मनासारखं काम सुरु झालं
मग माझं बस्तान निट बसु लागलं
आई-वडिलांच्या संस्कारांच आज चिज झालं
एकच प्याला आज रिता झाला॥१३॥
पहिलीच भेट आपली स्मरते
काळीज त्याच क्षणी विरघळते
अन प्रेमाची उभारी उसळते
एकच प्याला आज रिता झाला॥१४॥
सुगंध दरवळला अत्तराचा
त्यातुन गंध मोगर्याचा
अन उभार तव यौवनाचा
एकच प्याला आज रिता झाला॥१५॥
मग सुरु झाल्या नियमित भेटीगाठी
जुळु लागल्या भविष्यातल्या रेशिमगाठी
आता का प्रेमास तुझी आडकाठी ???
एकच प्याला आज रिता झाला॥१६॥
तुझं ते माझ्यावर रुसणं
गाल फ़ुगवुन रागवुन बसणं
अन त्यावर माझं मिश्किल हसणं
एकच प्याला आज रिता झाला॥१७॥
साजणे लवकर ये मज पाशी
खेळू नकोस असं काळजाशी
राहू नकोस लांब, तू हि अशी
एकच प्याला आज रिता झाला॥१८॥
आज तुझी खुप वाट पाहिली
पण वाट शेवटी रिती राहिली
ती रात्र तुझ्या आठवणीना वाहिली
एकच प्याला आज रिता झाला॥१९॥
तुझ्या आठवणीत आता ६ पेग झाले
तुझे गुण गान गायचेच राहिले
ह्यापुढील पेग तुझ्यासाठीच भरले
एकच प्याला आज रिता झाला॥२०॥
तुझा समजुतदारपणा मला आवडतो
मी स्वत: तसं व्हायचं ठरवतो
पण तुला पाहिल्यावर भान विसरतो
एकच प्याला आज रिता झाला॥२१॥
तुझी नातं जपण्याची कला भन्नाट आहे
तुला आपल्या नात्याची जाण आहे
तुझ्यात सद्गुणांची खाण आहे
एकच प्याला आज रिता झाला॥२२॥
तु आपल्या सहजिवनाची स्वप्न रंगवतेस
मला तुझ्या ह्र्दयात अढळ स्थानी बसवतेस
मुलांगत हट्ट करुन मला हसवतेस
एकच प्याला आज रिता झाला॥२३॥
वसे सरस्वती तुझ्या वाणीत
जसे खळखळे पाणी नदीत
नसे तुझ्यासम कुणी या भुमित
एकच प्याला आज रिता झाला॥२४॥
तुझा प्रेमावर विश्वास आहे
माझी तुझ्यावर श्रद्धा आहे
पण तुला दुनियेची फिकिर आहे
एकच प्याला आज रिता झाला॥२५॥
शाळा कॉलेजच्या गोष्टी ६-६ प्याल्यात सांगुन झाल्या
तुझ्या...अरे १२ झाले तरी अपुर्याच राहिल्या
म्हणुनच ह्यापुढील मधुसरिता तुझ्यासाठीच वाहिल्या
एकच प्याला आज रिता झाला॥२६॥

कशे दिवस मस्त होते

कशे दिवस मस्त होते
तारुण्याचे , गाभूळ्लेले
व्यायामाचे ,
योगाचे ...!!
कवितेचे, स्वप्नाचे ,
प्रेमाचे दिवस होते
घराला घरपण होते
घर म्हणजे श्रीखंड होते
आंबट चिंबट चवदार होते
सगळे कसे मस्त होते
तशात ती आली
गोरी नव्हती काळी नव्हती
मधला असा रंग होतां
असा रंग असा रंग
डंख मारून पसार झाला
जाड नव्हती ,लुकडी नव्हती
गाभुळलेली मस्त होती
अशी चव- तशी चव
कधीसुद्धा माहित नव्हती
गळ्यात चेन
कानात रिंग
केसात गजरा
आणि असे मस्त गाणे
वातावरण भारून गेले
छानच होती
मस्त होती
सुंदर अशी गझल होती
गीत होते
सूर होते
सास तेरी मदिर मदिर
जैसे रजनी गंधा .....
अशे मस्त... अशे मस्त
सुंदर ,भन्नाट
गीत होती
पुढे काय ..?
आज देखील म्हणतो आहे
दिवस कसे मस्त होते .....
आठवणीची पाखरे
कधीतरी येऊन बसतात
मनाच्या फांदीवर
छान झुलत झुलत
मस्त शिळ घालून जातात ......!

जेंव्हा आपण कुणाच्यातरी प्रेमात पडतो...


जेंव्हा आपण कुणाच्यातरी प्रेमात पडतो,
तेंव्हा आपण आपलेच राहिलेलो नसतो,
डोक्यात फक्त तिचाच विचार फिरत असतो,
अन डोळ्यासमोर फक्त तिचाच चेहरा दिसत असतो,

आपल्या वागण्यात अचानक बदल घडतो,
गचाळपणा जावून टापटीप पणा येतो ,
दिवस-रात्र फक्त तिचाच विचार सुरु होतो,
अन आपल्याच जगात आपण रममाण होतो,

चोवीस तास मोबाईल कानालाच असतो,
मिनिटा-मिनिटाचा वृतांत प्राप्त होत असतो,
बाकी मित्र-मंडळीचा मग हळू-हळू विसर पडतो,
अन आई-वडिलांसाठी तर आपल्याकडे वेळच नसतो,

दिवसामागून दिवस, महिन्यामागून महिने,
काळ असाच पुढे सरकत असतो,
दोघांच्याही नात्यात दररोज,
नव-नवीन रंग भरत असतो,

हळू-हळू सुरु होतो मग रुसव्या-फुगव्यांचा लपंडाव,
कधी याच्यावर तर कधी तिच्यावर येत असतो डाव,
कारण दोघेही घेत असतात एकमेकांच्या हृदयाचा ठाव,
काहीच नाही झालं की शेवटी बोलतात, आता एवढाही खाऊ नकोस भाव,

अचानक एक दिवस अशी येते वेळ,
त्यावेळी सुरु होतो नियतीचा खेळ,
मग दोघांच्यातही रहात नाही कसलाच ताळ-मेळ,
अन अर्ध्यावर्तीच मोडून जातो त्यांच्या प्रेमाचा खेळ...

स्वप्न


माझ्या जिवणाला कुणी आता ओळखावे
माझ्या हसण्याला कुणीतरी समजावे
माझ्या जिवणाचे कुणीतरी गीत गावे
माझ्या आयुष्याला आता वेगळाच रंग यावा
माझ्या भावनांचा अर्थ कुणी समजावा
माझ्या अश्रुनांही आता मोल यावे
आयुष्यात माझ्या आता काही तरी व्हावे
जगही लाजेल असे आता घडावे
माझे जिवणगाणे मीच आता आळवावे
प्रेमाची आशा न करता मीच प्रेम व्हावे
मैत्रीतही मीच आता केंद्रबिंदु व्हावे
मी काय व्हावे ? मी कोण व्हावे ?
मीच माझे स्वप्न व्हावे...
मीच माझे स्वप्न व्हावे...

Prem


प्रेम हे होत नसत
प्रेम हे कराव लागत
आपल अस कुणिच नसत
आपलस कराव लागत


एकदा तरी स्वताहुन
वादळात झोकायच असत
नाहिच हाती आल तर
"त्याच वादळात"
मनसोक्त मरायला शिकायच असत

म्हणूनच
प्रेम हे होत नसत
प्रेम हे कराव लागत
आपल अस कुणिच नसत
आपलस कराव लागत"

आता ते सर्व क्षण आठवतो


आता ते सर्व क्षण आठवतो
ज्यांना मी कधीच समजू शकलो नाही
मीही खूप आनंदी होतो इतरांप्रमाणे
जेव्हा त्या क्षणां समवेत होतो

नव्हते कुणाची पर्वा मलाही
नव्हते कोणतीही सीमा मलाही
नव्हते कुणाची भीती मलाही
जेव्हा तिच्या समवेत असायचो मी

आता ते सर्व क्षण आठवतो
ज्यांना मी कधीच समजू शकलो नाही
होता तोच चंद्र आम्ही असल्याची साक्ष देणारा
दूर असतांना निरोप आमचे घेऊन येणारा

बिझी असायचा फोन आमचाही
जेव्हा एकमेकांशी तासंतास गप्पा मारायचो आम्हीही
स्वप्नांच्या सुंदर विश्वात हजेरी असायची आमचीही
जेव्हा एकमेकांच्या विचारात असाच डुबायचो आम्हीही

आता ते सर्व क्षण आठवतो
ज्यांना मी कधीच समजू शकलो नाही
खूप काही ठरवायचो एकटे असल्यावर
मात्र गप्पच बसायचो एकमेकांसमोर आल्यावर

कळत होते सर्व तिलाही
पण मीही उगच चेष्टा करायचो
मीच नेहमी बोलावं अस ती हट्ट धरायची
पण त्यावेळी मी मात्र शांत बसायचो

आता ते सर्व क्षण आठवतो
ज्यांना मी कधीच समजू शकलो नाही
खूप गप्पा मारत बसायचो
मात्र तोच विषय नेहमी टाळायचो

फार उशीरा का होईना कळू लागले आम्हांलाही
पण आता बोलणार कोण आधी
या विचारातच आम्ही मात्र गप्प बसायचो
तू की मी या प्रश्नातच घुटमळत रहायचो

आता ते सर्व क्षण आठवतो
ज्यांना मी कधीच समजू शकलो नाही
पण हाच प्रश्न घातक होईल
असं कधीच वाटले नव्हते मलाही

मात्र आता असे वाटते
फक्त एकदा तिने समोर यावे
समोर येऊन माझ्याकडे
एकदाप्रेमवेड्या त्या नजरेने बघावे

सांगेल सर्व तिलाही
पण आता तेही शक्य नाही
माझ्या एका हाकाने येईल
इतकी जवळ आता तीही नाही

आता ते सर्व क्षण आठवतो
ज्यांना मी कधेच समजू शकलो नाही
काय मी केलेले प्रेम खोटे होते ?
काय मी घातलेला वेळ तिच्यासाठी काहीच नव्हता ?

आजही सुटत नाही प्रश्न हे
माहित आहे सर्व उत्तरे तिला
पण प्रश्नच मी कधी केला नाही तिला
काय प्रश्न शोधत असेल ती माझा ?

ठाऊक असते की दुरावा प्रेमात असतो
तर प्रेम या शब्दापासूनही दूर राहिलो असतो
आजही तिन प्रश्न मला नेहमी पडतात
1) काय प्रेम या शब्दाला काही अर्थ आहे?
2) काय प्रेमाला समजुन घेणारं कोणी आहे?
3) काय माझ्या या प्रश्नांचे उत्तर् देणारं कोणी आहे?

हे बघ काय करून गेलीस तू...


हे बघ काय केलस तू....
कुणालातरी जगायला शिकवलेस तू
कुणालातरी हसायला शिकवलेस तू
कुणालातरी प्रेम करायला शिकवलेस तू
कुणालातरी रडायलाही शिकवलेस तू
माझा विचार न करता मला सोडून गेलीस तू
पण
हे बघ काय करून गेलीस तू
कुणालातरी जगायचा अर्थ शिकवून गेलीस तू
अश्रुंची किंमत समजावून गेलीस तू
नात्यांची किंमत काय असते ते समजावून गेलीस तू
विरहाचा अनुभव देऊन गेलीस तू
एक शहान्याला वेडा करून गेलीस तू
आणि एक वेड्याला कवी करून गेलीस तू

पुन्हा एकदा भेटायचय....


कितीही वेळा तू भेटलीस,
तरी मनी एक आस असायची,
शेजारी माज्या बसलीस की
अंगात एक विज कडकडायाची.

मी भेटायला येणार म्हणुन,
नट्टापट्टा तू तासभर करायचीस,
भेटल्यावर कौतुक नाही केल म्हणुन,
किती हक्काने भांडायाचिस.

भेटायला तू येणार म्हणुन,
बघता बघता तिन वर्ष लोटले,
तुझ्यासाठी जपलेले शब्द,
मनातल्या मनातच दाटले.

दिलासा देण्यासाठी तरी,
तू पुन्हा एकदा भेटणार ना?
नाही करणार तक्रार कधीही,
मग तर सोडून नाही जाणार ना?

स्पर्शाच्या त्या तुज्या भाषेला,
पुन्हा एकदा तरी अनुभवयचय,
माज्याशी हक्काने भांडताना,
पुन्हा एकदा तरी बघायचय.

मैत्री वाचून रडते , मैत्री पासून हसते...

मैत्री वाचून रडते , मैत्री पासून हसते...
कळत नाही मला तू आशी का वागते..
मैत्री आस्ते दोन जीवाची जोडी..
त्यात फुलायची आस्ते सुंदरशी गोडी...
एक फुल तुटल म्हणून अशी का रुसते ..
नवे उमलणारे फुल आहे तुच्या अवती भवती ..
गोडी तीच आहे , मैत्री हि तीच आहे कधी आजमावून बघ..
तुझ्या कोमल पायाखालील काटे , स्वताच्या पाई घेणाऱ्या या मित्राला कधी समजून तर बघ...
रोज किती तू त्रास करून घेशील ..
ऐका मैत्रीच्या आठवणीत तू कितीना दुखावाशील...
थोडासा विचार कर , मनाला स्थिर कर ...
किती वेळ समजावशील त्याला , कधीतरी  माझा विचार कर...
तुझ्या डोळ्यातील आश्रू बघवत नाही मला..
बघ त्या  सूर्याकडे , तो सांगतोय काहीतरी तिकडे ...
 " तुझी नृत्य कला हीच तुझा लक्ष्य आहे "
या कलेपाई तू विसर मला हि, तुच्या ध्येयाच्या पलीकडे ,  कारण ..
कळत नाही मला तू आशी का वागते...  

सांग सख्या माझ्या सवे मैत्री तू करशिलका...........?

सांग सख्या माझ्या सवे मैत्री तू करशिलका...........?
माझ्या सवे अंगणी खेलात तू रमशील का...........?
झाडावरच्या झुल्यावरी माझ्या सवे झुलाशील का.....?
खेलातला डाव मोडून माझ्यावरी रुसशील का.........?
सांग सख्या माझ्या सवे मैत्री तू करशिलका............. ...?

अंधारात रात्रीचा चंद्र तू होशील का............ ..?
अडकलता पाउले हात तुझा देशील का..........?
चुकता माझी पाउले राग तू कराशिला का...........?
सांग सख्या माझ्या सवे मैत्री तू करशिलका............ ...?

आली असता संकटे झेलुनी तू घेशील का..........?
काटेरी रस्त्यावर साथ माझी देशील का............ ......?
लापविता दुःख मी तास माझा घेशील का............ .......?
सांग सख्या माझ्या सवे मैत्री तू करशिलका............ ...?

माझ्या सवे मनामोकल्या गुजगोष्टी करशील का........?
समजुन माझ्या अडचणी सहानुभूति देशील का.......?
येता वाईट विचार मनी नवी उमेद होशील का.........?
सांग सख्या माझ्या सवे मैत्री तू करशिलका............. ...?

देशील माला प्रेम अणि माझे प्रेम घेशील का......?
कही क्षण जीवनात आनंदाचे देशील का..........?
ठेवशील मला मनी अणि आठवणीत राहशील का....?
सांग सख्या माझ्या सवे मैत्री तू करशिलका.............?

फ़ुलपाखरु ते


फ़ुलपाखरु ते

अशाच एका संध्याकाळी
फ़ुलपाखरु ते मज-जवळ आले
येऊन सुदर, स्वछंदी, ऊनाड
कानी माझ्या दु:ख सागुन गेले...

ओळख नाही त्याची नि माझी
पहिल्याच भेटीत इतक्या जवळ आले
मीही मित्र म्हणून दु:ख तुझे आहे ते माझे
सागुनी प्रेमळ स्वप्णी त्यास वचन दिले...

दिवस रात्र झटलो
दु:ख त्याचे दुर करण्यामागे लागलो
माहित होती व्यथा त्याची मला
स्वत:ला विसरुन त्याजवळ जाऊ लागलो...

हसत रहवे त्याने सतत
म्हणून स्वत: रडत राहिलो
कळत-नकळत मन माझे त्यासी जुडले
स्वछंदी मन माझे मला सोडुनी गेले...

दिवस तो मग असाच एक
न सागताच आला
फ़ुलपाखरु ते उडुन दूर गेले
आहाकार मनी माजला...

फ़ुलपाखरुच ते, नाही बंधनात कुणाच्या
उगाच मन हे भ्रमात होते
कधी न कुणाचे झाले ते
मन माझे त्याच्या साथ होते...

कधी न ह्रुदयाच्या "बीट" त्या
आज त्यासाठी पडू लागल्या
लळा लाऊनी ते इतके गेले
आठवणी स्वप्णी येऊ लागल्या...

नेहमीच ते माझे-माझे
म्हणत राहिलो
पण त्याचा कधी
मी झालोच नाही....

असं प्रेम करावं

असं प्रेम करावं थोडं सांगावं थोडं लपवावं,
असं प्रेम करावं थोडं रुसावं थोडं हसावं,
गुपचुप फोन वर बोलावं,कोणाची नाज़र पडताच पटकन
"अगं" चा "अरे" करावं असं प्रेम करावं
जग पुढे चाललं असलं तरी आपण मात्र थोडं मागेचं रहावं,
फोन SMS, आणि E-MAILS च्या जगात ही,
आपण मात्र पत्र लिहुन मांडावं, असं प्रेम करावं
कुठे भेटायला बोलवावं, पण आपण मात्र उशिरा जावं
मग आपणच जाऊन sorry म्हणावं, असं प्रेम करावं
वर वर तिच्या भोळसट पनाची, खूप चेष्टा करावी,
पण तरीही ती तुम्हाला किती आवडते, हे जरूर सांगावं, असं प्रेम करावं
प्रेम ही एक सुंदर भावना, हे ज़रूर जाणावं,
पुन त्या बरोबर येणार्‍या वेदनांना ही सामोरं जावं असं प्रेम करावं
विरह येतील, संकट ओढवतील, प्रेमाच्या अनेक परीक्षा होतील,
पण आपण मात्र खंबीर रहावं, असं प्रेम करावं
एकदाच होतं, नशिबवानानाचं मिळतं,
म्हणूनच जीवापाड जपावं,
असं प्रेम करावं ... असं प्रेम करावं.........

स्वप्नांत माझ्या तू येशील का?

स्वप्नांत माझ्या तू येशील का?
हातात हात तु देशील का?
प्राणप्रिया माझी तू होशील का ?
स्वप्नांत माझ्या तू येशील का?

थंडगार वारा कानात हळूच सांगे,
रममाण व्हावे मी प्रिये तुझ्यासंगे ,
हृदयात जागा मला देशील का ?
स्वप्नांत माझ्या तू येशील का?

वाटे पक्षापरी उडून तुझ्याजवळ यावे ,
नि:सुंदर ते रूप तुझे पाहतच रहावे ,
मनाची राणी तू होशील का ?
स्वप्नांत माझ्या तू येशील का?

सर्व दु:खे विसरुनी जाऊ ,
सुखी जीवनप्रवास कापत राहू ,
सुखदु:खात साथ तू देशील का?
स्वप्नांत माझ्या तू येशील का?

हृदय माझे पण प्रत्येक श्वासात तू ,
शरीर माझे पण त्याची आत्माच तू ,
अर्धांगिनी माझी तू होशील का ?
स्वप्नांत माझ्या तू येशील का?

जगी सर्वसुखी संसार आपला होईल ,
बंधनरूपी प्रेमाचे प्रतिक गणले जाईल ,
जन्मभर हे बंधन तू निभवशील का?
स्वप्नांत माझ्या तू येशील का?

तुला माझी आठवण होईल.....

जेव्हा कधी कोणावर प्रेम करशील
तुला माझी आठवण होईल
तुझ्याही डोळयांत तेव्हा
माझ्यासोबतच्या क्षणांची साठवण होईल

आठवणी जेव्हा माझ्या
तुला एकांतात कवटाळतील
तुझ्याही नजरा तेव्हा
माझ्या शोधात सैरावैरा पळतील

जेव्हा त्याला प्रेमाने बघशील
तेव्हा तुला मी दिसेन
...
त्याला शोधणा-या तुझ्या नजरेत
तेव्हा फक्त मी असेन
...
तेव्हा तुला माझे शब्द पटतील
तुझ्याही नजरेत तेव्हा
...
माझ्यासाठी अश्रू दाटतील
....
माझ्यासाठी रडणारे ते अश्रू
तेव्हा तुझ्यावरच हसतील
कारण तुझ्या गालांवर टिपणारे त्यांना
ते ओठ तेव्हा माझे नसतील...!!!

मला ती खुप आवडायची...

मला ती रोज दिसायची ..मला ती खुप आवडायची..
वाटायच विचारव पण तिच्या नकाराची भीती वाटायची..
उन पावसाची पर्वा ना करता मी रोज तिथे यायचो...
तिची एक झलक मिळवण्यासाठी किती किती झुरायचो..

एक दिवस हिम्मत करून विचारले..
तिने माझ्या प्रेमाला नाकारले..
माझ्या वेड्या जिवाला हा धक्का सहन नाही झाला...
अखेर तडफडतच माझा जिव निघून गेला..

कालच माझी अंत्ययात्रा निघाली...
ती कुठेच दिसत नव्हती...
म्हटल मी मेल्या वर तिचा आनंद ओसंडून जात असेल..
मला मेलेला बघायला ती देखिल आली असेल..

जाता जाता मला ती बघायला भेटेल...
तिचा सुंदर चेहरा मला डोळ्यात साठवायला भेटेल..
माझी वेडी नजर तेव्हा पण तिलाच शोधत होती...
सगलीकडे बघितल कुठेच दिसत नव्हती..

तीला तिची चुक उमगली होती..
म्हणे दिवसभर ती देवळात बसली होती........!

याक्षणी आठवतेस तू...

न चुकता करावा तुला फोन
मग, उगाच तु चेष्टा करून बोलावं
बोलता-बोलता असाच वेळ निघून जावा...
याक्षणी आठवतेस तू...

फोन हाती घेतल्यावर बघावा
तु पाठवलेला जुनाच एखादा "मेसेज"
बघून मग असाच विचार करत बसावा...
याक्षणी आठवतेस तू...

एखाद्या दिवशी पहावी वाट
करशील तू फोन म्हणून, तुझं मात्र
वेळ नाही बोलू आपण नतंर...
याक्षणी आठवतेस तू...

तुझं नेहमीच खट्याळ बोलणं
माझं मात्र नेहमीच तुला रागवणं
पण तरीही तुझं शात बसणं...
याक्षणी आठवतेस तू...

तुझा नेहमीच माझ्याकडे हट्ट
माझं मात्र नेहमीच रूबाब दाखवणं
तरीही तुझा मझ्यावर विश्वास असणं...
याक्षणी आठवतेस तू...

मित्र म्हणून काय नाही केलस तू
माझं मत्र "मी असाच आहे"
पण तरीही सागण्याचा तूझा प्रयत्न असणं...
याक्षणी आठवतेस तू...

नेहमीच तूझं प्रेमानं बोलणं
माझं मात्र नेहमीच टोचून बोलणं
तरीही तू एकून घेण्याचं मोठेपण असणं...
याक्षणी आठवतेस तू...

डोळ्यातील अश्रूही थाबेना आज
रूसलेत तेही मझ्यावर
मिही अश्रुची चादर पाघंरणार मनावर...
याक्षणी आठवतेस तू...

"मैत्री आपली मनात जपलीस
कधी सावलीत, कधी ऊन्हात तापली
कधी फुलात, कधी काट्यात रूतली
तरीही तू ती मनात जपलीस..."
याक्षणी आठवतेस तू...

केलेस लग्न का तू? - एक "विजल"



आयुष्य आज माझे मोडीत काढले मी !
स्वर्गातुनी सुखाच्या पाऊल काढले मी !!

ती बोलते अशी की, मी कोण घोर पापी !
भाळूनिया दिवाळे माझेच काढले मी !!

तो हो तिचा नगीना, माझ्या गळ्यास फाशी !
फासातुनी कितीदा मानेस काढले मी!!

वैतागलो जिवाला, पण कीव येत नाही !
श्वासात वेदनेचे हुंकार काढले मी !!

"जाशी बळेचि तूही का बावळ्या हलाली !"
त्यांनी दिले इशारे, वेड्यात काढले मी !!

"केलेस लग्न का तू? नाही? नको करू रे!"
ती घोडचूक एक" - अनुमान काढले मी !!

हा 'जीत' चीत झाला झेलून रोज हल्ले !
माझ्यातल्या विजेत्यां बाहेर काढले मी !!

सहज एक दिवस विचारल तिला

सहज एक दिवस विचारल तिला
सखे मी तुला काय आणु ?
थोडीशी फुल,थोडेसे मोती
आणि चांदण आण ओंजळ्भरून

मनात म्हणालो स्वतालाच
प्रेम भलतच महाग असत
जमल तर वार्‍याची झुळुक
नाहीतर जाळणारी आग असत

ओंजळभरून फुल
एक दिवस तिला नेउन दिली
काय सांगू आनंदाने
सखी मझी हरकून गेली

आज फुल दिली
उद्या मोती देइल
ओंजळ्भरून चांदण
माझ्यासाठी घेउन येइल

शेवटी एक दिवस सांगितल तिला
चांदण तर खूप दूर आहे
मी तुला मोतीही देउ शकत नाही
तुझी एवढीशी इच्छा माझ्याकडून
पूर्ण होउ शकत नाही

क्षणभराच्या शांततेनंतर
सार आभाळ भरून आल
माझ चांदण माझ्या समोर
रीमझीम रीमझीम बरसून गेल

किती रे वेडा आहेस तू
प्रेम कधी काही मागत का?
प्रेमाला प्रेमाशिवाय
दुसर कधीकाही लागत का?

स्वतालाच विसरून स्वतालाच
प्रेम म्हणजे देण असत
आयुष्याला सुरात बांधेल
प्रेम अस गाण असत
मोती काय चांदण काय
प्रेम कधी कोणी मोजत का?
चंद्र समोर असताना
कोणी चांदण शोधत का???

सांग ना रे सख्या तू असा कसा......???

मनातले प्रेम चेह-यावर
दिसू देत नाहीस,
डोळ्यांनी बोलतोस पण
ओठांवर येऊ देत नाहीस,
तुझा हा प्रेमाचा खेळ मी ओळखू तरी कसा....!!
सांग ना रे सख्या तू असा कसा......???

फोनवर बरेच सांगतोस पण
प्रेमळ काहीच बोलत नाही
भेटीच्या तारखा ठरवतोस पण
भेटणे काही होतच नाही
आहेस माझा प्रियकर पण भासे जणू मित्र जसा....!!
सांग ना रे सख्या तू असा कसा......???

तुझ्यावर केलेली कविताही तू
वाचून नुसता हसतोस,
वाटतं काहीतरी बोलशील पण
"छान" बोलून गप्प बसतोस
प्रोफेशनल तुझं वागणं तू रोमांटिक होशीलच कसा...!!
सांग ना रे सख्या तू असा कसा......???

आजारी असली जरी मी तरी
तू एकदाच फोन करतोस,
त्यातही तब्येत विचारायची सोडून
काहीतरीच बडबडत बसतोस,
आहे जसा माझ्या मनातला राजा नाहीच मुळी तू तसा...!!
सांग ना रे सख्या तू असा कसा......???

रागावलीच मी तर
तुला मुळीच करमत नाही,
मझ्याशी बोलल्या शिवाय
तुलाही राहवत नाही,
समजून घेते मी तुला कारण मला हि तू आवडतोस असा
सांग ना रे सख्या तू असा कसा......???

मैत्री म्हणजे काय असत?

मैत्री म्हणजे काय असत?
एकमेकांचा विश्वास असतो?
अतूट बंधन असत? की
हसता खेळता सहवास असतो?
 
मैत्री म्हणजे मैत्री असते,
व्याख्या नाही तिच्यासाठी;
अतूट बंधन नसत,
त्या असतात रेशीमगाठी
 
मैत्री असते पहाटेच्या दवासारखी,
थंडगार स्पर्श करणारी;
मैत्री असते केवड्यासारखी,
तना-मनात सुगंध पसरवणारी
 
मैत्री असते सुर्योदयासारखी,
मनाला नवचैतन्य देणारी;
मैत्री असते झाडासारखी,
उन्हात राहून सावली देणारी;
 
मैत्री करावी सोन्यासारखी,
तावुन-सुलाखून चमचमणारी;
मैत्री करावी हिर्या सारखी,
पैलू पडताच लख-लखणारी;
 
मैत्री असावी पहाडासारखी,
गगनाला भिडणारी;
मैत्री असावी समुद्रासारखी,
तलाचा थान्ग नसणारी;
 
मैत्री म्हणजे समिधा असते,
जीवन यद्न्यात अर्पण झालेली;
स्वताच्या असन्याने सुद्धा
मन पवित्र करणारी;
 
मैत्री हे नाव दिलय
मनाच्या नात्यासाठी;
अतूट बंधन नसत त्या असतात ....
रेशीमगाठी

प्रेम म्हणजे काय असतं


प्रेम म्हणजे काय असतं
कधी "छप्पर फाड के" कधी फाटक्यात पाय असतं
 
प्रेम उगवतीचा सुर्य
कधी पश्चिमेचा सुर्यास्त असतो
प्रेम झालं ह्याच्यापेक्षा प्रेम होईल
हाच विचार मस्त असतो
जगातल्या सगळ्या वेदनांवर प्रेम छान उपाय असतं
 
प्रेम म्हणजे कधी तुटलेली काठी
कधी मजबुत आधार असतं
त्यात कधी प्रेमळ चुंबन असतं
कधी चपलांचा मार असतं
प्रेम दुधात मिसळलेलं पाणी तर कधी दुधावरची साय असतं
 
वर्गातल्या आवडत्या मुलीला बघुन
शेंबडया दहावीकराच्या मनात नगारे वाजतात
अन बागेतल्या बाकडयावर बसलेले
म्हातारे आजोबा आजींना बघुन हळुचं लाजतात.
प्रेम किशोर वयात होतं,प्रेम म्हातारपणी होतं कारण प्रेमाला वय नसतं
 
एखादा दिवस-रात्र हमाली करणारा
भाजी विक्या त्या गोड मुलीकडे पाहतो
आठ तासाचा बांधील बंदा बाईकवर जाताना
फोर-व्हीलर वालीला पहात राहतो
प्रेम कधी हाय-फाय तर कधी गावठीतला न्हाय असतं
 
प्रेमात सगळ्याचं चवी येतात
तिखट आंबट,गोड,कडु
सारखं गोड बोलणं काय असतं
कधीतरी त्यात असावं रडु.
प्रेम कधी सात मजली स्माईल कधी छोटसं क्राय असतं

विसरू कशा मी तुझ्या आठवणी ?

विसरू कशा मी तुझ्या आठवणी ?
पूर्वजन्माची ती कहाणी |
एक राजा आणि एक राणी ,
गात होते मधुर गाणी ||
एकांकी जीवनात माझ्या अवतरली एक परी ,
घेउनी गेली ती मजला तिच्या स्वप्ननगरी ,
सुखावले नयन पाहून ती सुंदर जादुगरी |
प्रेमात तिच्या मोहरून स्तब्ध झाली वाणी ,
विसरू कशा मी तुझ्या आठवणी ?......
पण , विघ्न येता ताटातूट झाली ,
सारी मधुर स्वप्ने विखुरली ,
गाठ जन्मभराची क्षणातच सुटली |
वदविता ना आली मजला व्यथा केविलवाणी ,
विसरू कशा मी तुझ्या आठवणी ?......
माहित होते मजला स्वप्नं हे भंगणार ,
काळोख्या आशेतच मला जन्मभर कोंडून ठेवणार ,
रहस्यमय जीवनाचे हे कोडे कसे उकलणार ?
अक्रोशातच संपणार हि रात्र जीवघेणी ,
विसरू कशा मी तुझ्या आठवणी ?.......
नंतर नवे मार्ग दिसले , नव्या दिशांनी सावरले ,
स्वर घायाळ मनाचे दुसरे कुठेतरी गुंजले ,
अंधाऱ्या रहस्याचे उत्तर आता सापडले
आणि सुरु झाली एक नवी कहाणी ,
पण .......विसरू कशा मी तुझ्या आठवणी ?....

प्रेमापेक्षाही जास्त आहे ..........

माझे तुझ्यावर प्रेम आहे,पण मी खोटे बोलले..
कारण मला तुझ्यासाठी जे वाटतय ते
प्रेमापेक्षाही जास्त आहे..
कसे असु शकते प्रेम
इतके चांगले की , दोन अनोळखी दोस्त बनले,
इतके निरागस की , प्रेमही दोस्तीत गुंफ़ले गेले,
इतके हवेसे की, सर्व कॉल वाटत असतात तुझे,
इतके मुर्ख की , रोमिंग चाही चालतोय मला खर्च,
इतके प्रेरक की ,सरळ आयुष्यही झाले आहे दिलखेचक,
इतके हळवे की , तुझ्यावरील संकटाने डोळे भरतात माझे,
इतके तेजस्वी की , तु आठवणिंनी ओजंळ भरलीय माझी,
इतके निस्वार्थि की , तुझ्या लग्नाला पाहुणी आहे मी..
कारण मला तुझ्यासाठी जे वाटतय ते..
प्रेमापेक्षाही जास्त आहे

परतणं कस जमेल आता?

परतणं कस जमेल आता?
येणं-जाणं माझ्या हातात असतं तर...
तर तेव्हाच तुझ्यापासून दुर झाले असते का???

अस्तित्व पणाला लावलं,
तुझ्यापासून दूर होऊन.
काही उरलचं नाहीये आता माझं....
मन तेव्हाही तूच व्यापलं होतंस आणि आताही तुच...
जगणं चाललंय ते फक्त तुझ्या आठवणींवर
त्याही लपून आठवाव्या लागतात

अस्तित्वहीन आयुष्य जगतेय
कदाचित फक्त कर्तव्यासाठी.....

तुला नाहीत ना बंधनं कसलीच?
म्हणुनच सांगतेय,
गोंजार माझ्या आठवणींना...
जप त्यांना मुक्तपणे....
मोकळा श्वास घेतील त्या तुझ्याकडेतरी...
आणि त्यांच्याबरोबर कदाचित मीही.

असंच जगुयात आपण
परतणं तेवढं नाहीच जमणार.....

तू जाताना ........

तू जाताना बघत होतो मी पाठमोरी तुला
आणि तू नजरेआड झालीस तेव्हा तुझ्या पाऊलखुणांना..
रेतीमध्ये उमटत "जाणारी" तुझी प्रत्येक पाऊलखुण
मनामध्ये एक जखम करून जात होती.. आयुष्यभर कुरवाळण्यासाठी

अताशा जात नाही मी त्या समुद्रकिनार्यावर

तुझ्या त्या मिटलेल्या पाउलखुणा शोधायला
तुला अन मला आपलं मानणार्या,
त्याच समुद्राच्या लाटांनी, तुझ्या तिथल्या आठवणी पुसल्या असतील अता..
हो पुसल्याच असतील...या लाटाही जगासारख्याच वागतात..

आणि कशाला शोधू मी तुझ्या पाउलखुणा?

तुझी प्रत्येक आठवण...
प्रत्येक शब्द तुझा या मनावर कोरलेला आहे.. अजुनही,
मग पाऊलखुणांची काय गरज मला?

कधी आलीस तर बघून जा,
तू.... तुझ्या आठवणी... तुझं प्रेम...
अजुनही जपून ठेवलंय मी जसंच्या तसं
डायरीच्या प्रत्येक पानात, प्रत्येक शब्दात.
हो.. मला मात्र विसरलोय पुरता
तसा शोधतही नाही मी मला.

मी तिला असं दुःखवायला नको होतं……

कधी कधी माझं मन मला खायला उठतं,
मी तिला असं दुःखवायला नको होतं…
हां, झालं असेल काही उलटं सुलटं,
कदाचित ते तिच्या मनात नसेल सुद्धा..!!
मी कधी याचा विचारच का केला नाही?
आत्ताच का डोकं खायला लागलाय हा मुद्दा..??
पण तरीही ती माझीच होती,
कमीतकमी त्या क्षणापर्यंत तरी..!!
झालं गेलं विसरून जां !! असं म्हणायला पाहिजे होतं,
पण कुणी?, मी नाही म्हटलं… तिनं तरी??
तिला काय वाटत असेल आत्ता?
जे घडलं त्या दिवशी, याचा ती विचार करत असेल का…?
शेवटी मान्य करुन चूक तिनं केली घोडचूक …पण,
मी काय करू? काय नको ? …असं मलाच कोड्यात टाकलं .. ते का?
मी काहीच बोललो नाही.
बोलायचं होतं, पण शब्दच फुटले नाही..
बस्स.. डोळ्यात डोळे घालून बघत राहिलो,
पण कदाचित म्हणूनच ती तिथं थांबली सुद्धा नाही..!!
शेवटचा निर्णय तिचाच होता ,
त्यावर तरी मी काहीतरी बोलायला हवं होतं,
दुःखवायचं होतं तिला, म्हणून चूप राहिलो, पण.. आत्ता वाटतं..
मी तिला असं दुःखवायला नको होतं…
मी तिला असं दुःखवायला नको होतं……

अनेक माणसं भेटतात...पण्

अनेक माणसं भेटतात,
काही आपल्याला साथ देतात
काही सांडून जातात........

काही दोन पावलेच चालतात,
आणि कायमची लक्षात राहतात,
काही साथ देण्याची हमी देऊन,
गर्दीत हरवून जातात........

नाती जपता जपता तुटणार
नवीन नाती जुळत राहणार,
आयुष्य म्हटले तर,
हा प्रवाह असाच चालत राहणार........

v कुणी दूर गेले तर
जगणेही थांबवता येत नाही,
कारण ह्या अथांग सागरात
एकटे पोहताही येत नाही...

मैत्री हा असा एक धागा,
जो रक्ताची नातीच काय
पण परक्यालाही खेचून आणतो
आपल्याही मनाला जवळचा करून ठेवतो
आपल्या सुख-दु:खात तो स्वत:ला सामावून घेतो.

लिहित होतो कहाणी एका राजाची

लिहित होतो कहाणी
एका राजाची
त्याच्या प्रेमाची
हो माझ्या
स्वतःची..

प्रेमाच्या कहाणीत
नेहमी राजा-राणी
पात्र जूनी असली
तरी
नवी ही कहाणी..

नवी नव्या रंगाने
सजली माझ्या प्रेमाने
नवी
नव्या फुलाने
फुलली माझ्या प्रेमाने..

पहिल्याचं भेटीत ती
हृदयात
शिरली
असं वाटलं जणु
माझ्या करताचं घडवली..

मनं जवळ आले
जुळले
का नाही
तीने मला विसरलं
पण मी..मी विसरलो नाही..

आजही
तिच्याचं
आठवणीत जगतो
गर्दित ही देखिल
एकटाचं असतो..

संध्याकाळी
तिची
आतुरतिने वाट पाहतो
प्रेमाच्या कहाणीची
गोड हळवार शोधतो..

माझी
कहाणी अधूरी
होणार का कधी पूरी..?
हळूचं पावलाने पुन्हा
प्रेम
शिरणार का उरी..?

म्हणून मला थोडा वेळ एकटयाला जगू द्या !!

मी काही जगात पहिला नाही
ज्याच्या प्रियसीच लग्न झालाय
आता दु:ख करण्यात काय अर्थ
ती थोडीच परत येणार आहे
म्हणून मला थोडा वेळ एकटयाला जगू द्या !!

मी माझ्या मनाला समज घातली
पण, थोडा वेळ तर लागणारच
सार काही एका क्षणांत नाही संपत
या सारया लोकांना कोण सांगणार
म्हणून मला थोडा वेळ एकटयाला जगू द्या !!

मी जीवाच बर वाईट नाही करणार
मला पण भरपूर जगायचं
तिने मला प्रेमात नकार दिला म्हणून काय
मला अजून बरच काही बघायचं
म्हणून मला थोडा वेळ एकटयाला जगू द्या !!

मी कधी गप्प गप्प राहतो
याचा अर्थ मी तिचा विचार करतो असा
सारेच मला समजावण्याचा प्रयंत्न करतात
तुला हे वागण शोभत नाही असा म्हणतात
म्हणून मला थोडा वेळ एकटयाला जगू द्या !!

बाहेरच्या लोकांच एवढ मनावर घेत नव्हतो
पण, आता घरच्यानिहि सुरवात केली
काय झाल जरा सांगशील का आम्हला
का तिच्यासाठी तू हि अवस्था झाली
म्हणून मला थोडा वेळ एकटयाला जगू द्या !!

तिच्याएवढी ती सुंदर नसलीतरी
कोणीतरी नक्कीच असेल माझासाठी
अण, मी पण तिच्याच शोधात आहे
जिच्यासोबत देवाने बांधल्या सातजन्माच्या गाठी
(कारण आठव्या जन्मी फक्त ती हवी)


म्हणून मला थोडा वेळ एकटयाला जगू द्या !!

काल मरून मी स्वर्गात गेलो

काल मरून मी स्वर्गात गेलो
इंद्र नाराज होता, रंभा तर फारच चिडलेली
एकंदरीत चित्र चिंताग्रस्त
माझ्या कर्मकांडाची फ़ाईल स्वर्गात हि रखडलेली

इंद्र म्हणाला प्रेम करायचा प्रेम करायचा
म्हणून तू तिच्यावर किती रे प्रेम करायचा
तुला प्रेम वाटता वाटता
माझ्या प्रेमाचा स्टोक मलाच कमी पडायचा

ती तुझ्याकडे ढुंकून हि पाहत नसली तरी
तू तिच्यासाठी रात्रं-दिवस झुरायचास
तिने पायाने लवंडली तरी
प्रेमाची घागर तू परत काठोकाठ भरायचास

तिने तुझ्याकडे पाहिलं नसलं तरी
हि रंभा तुझ्या प्रेमाच दररोज live telecast पहायची
दयेलाही दया येईल असे तुझे प्रेम पाहून
हि रंभा ढसा ढसा रडायची

सौंदर्य नको अमरत्व नको
मी तुझ्या सारखा प्रेम करेल असा वरदान मागायची
शिका जरा त्याच्याकडून
असा वरून मलाच गाल फुगवून सांगायची

येवढ माझा नाव घेतला असतास तर
मी हि तुला पावलो असतो
तुझ्या प्रत्येक संकटात मदतीला
स्वताहून धावलो असतो

येऊ दे तिला वर एकदा
सरळ तिला नरकातच पाठवतो
बघतोच मग तिला
तू कसा नाही आठवतो

तसा म्हणताच बोललो
म्हणालो ती नरकात जाणार असेल
तर मलाही तिथेच पाठवशील
नरक हि मला तिथे स्वर्गाहून सुंदर भासेल

का म्हणून तिने
माझ्याकडे यायचं
तहानलेल्याने पाण्याकडे
का पाण्याने तहानालेल्याकडे जायचं ?

मी साधारण मनुष्य, ती रुपाची राणी
मी साचलेलं पाण्याचं डबकं, ती झुळझुळ पाणी
मी खोबरेल तेल, ती अत्तरदाणी
मी हिमेश चा ऊऊऊऊ, ती लताची गाणी
मी खुरटे केस, ती लांब सडक वेणी
मी आरे च दुध, ती शुध्द लोणी

असा बोलताच इंद्राने चक्क हात जोडले
सकाळच्या पहिल्या गाडीने परत पृथ्वीतलावर धाडले
म्हणाला माझ्या संसाराला आग लावायचा तुझं काही तरी कपट आहे
सांगून सुधारणार नाही असा तू कुत्र्याचा शेपूट आहे

तू साधारण असलास तरी
तरी तुझं प्रेम असाधारण आहे
तिन्ही जगावर मात करेल
असा तुझ्याकडे कारण आहे

ते मखमली दिवस…!!





किती दिवस मागे गेलेत,मला तरीही आठवतं,
ते मखमली दुर्मिळ दिवस,पापण्या अझुन साठवतं;
तास अन तास तुझे आतुर डोळे असायचे, मी व्हायला नजरित,
मी दूर रस्त्या कड़ी दिसताच,तू हसायची जणू,मोगर कळी गजरित;
किती जिवापाड तू वाट पहायची,की कधी मी दिसतो,
तुला पाहताच ते ठराविक लपलं स्मित,कधी मी हसतो;
ती वाट बघण्याचा ठरलेला, तुझा तो कठडा,
वर्षाहून मोठा वाटायचा, तो काटलेला आठवडा;
माझ्या जिना चढन्यानीच, तूला काटवायची हुडहुडी,
श्वासायची तू माझ्या, वरच्या खीशीत गजर्याची पुडी;
माझ्या थंडावलेल्या हाथ तळव्यांना तू सुवासून ओठायची,
आणलेला गजरा मीच मळावा, म्हणून तू घीरकत पाठायची;
कधी मी माळून नाकावतो गजरा,म्हणून तू व्हायची अधीर,
माझ्या थंड लागल्या बोटानच,तू सोडायची पाळला धीर;
ठरल्या जागी ओठ माझे टेकताच,तूझं ते होणं बेभान,
माझ्या अंगी कडाडणारं ते विजेचं थैमान;
पुढे काय व्हायचं ते स्मरणीच ठेवणं छान वाटतं,
एक एक नाजूक क्षणनांची,जशी वादळी लाट लाटतं;
तुला आज कडी लटाकल्या वेणी, झोपलेलं पाहून वाटलं,
कितीही दिवस गेले तरी,तू तशीच दिसते हे पटलं;
वाटलं यावं जवळ, न देता कोणतीही चाहूल,
एकदा गारठल्या तळव्यानी,गुदगुदावं ते मेंदी नक्षीत पाउल.
प्रासंगिक प्रणय संवेदनांनी, धुंदावून वाढलं हे प्रेम साहस,
कदाचित तू विसरलीस पण, मी अझुनही जगतोय ते मखमली दिवस....!

आयुष्य....हे असंच असतं.????



कधी कधी खुप आनन्द देतं
न मागताही सुख देतं,
पण अच्यानक हासता हासता रडवतं
आयुष्य...हे असंच असतं.????

आपण बरंच काही ठरवतो
आयुष्याचे आराखडे बांधतो
पण एका वळणांवर सगळ काही थांबतं
आयुष्य...हे असंच असतं.????

भुतकाळातल्या गोड आठवणी
वेड मन आठवत रहातं
पण त्या मनाला फ़सवुन रडवतं
आयुष्य...हे असंच असतं.????

सुखाबरोंबरच दु:खहीं देतं
कधीही भरुन न येणां-या
भळभळणां-या जखमाहीं देतं
आयुष्य...हे असंच असतं.????

आयुष्यात खुप काही मिळतं
त्यातल बरंच काही नको असतं
पण जे हवं असतं तेच मिळत नसतं
आयुष्य...हे असंच असतं.????

गंध आवडला फुलाचा म्हणून...





गंध आवडला फुलाचा म्हणून
फूल मागायचं नसतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....

परक्यांपेक्षा आपलीच माणसं
आपल्याला नेहमी दगा देतात
एकमेकांच्या पाठीवर मग्
नजरे आडून वार होतात

भळभळणा-या जखमेतून
विश्वास घाताचं रक्त वाहतं
छिन्नविछीन्न जखमेला तेव्हा
आपणच पुसायचं असतं

अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....

आपलं सुःख पाहण्याचा तसा
प्रत्येकाला अधिकार आहे..
पण्; दुस-याला मारुन जगणं
हा कुठला न्याय आहे...

माणूस म्हणुन माणसावर

खरं प्रेम करायचं
आपल्या साठी थोडं,
थोडं दुस-यासाठी जगायचं

जगण्याचं हे ध्येय मनात आपणच बाणवायचं आसतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....

आपल्याला कोणी आवडणं
हे प्रत्येक वेळी च प्रेम नसतं
आकर्षणाचं स्वप्नं ते
आकर्षणंच असतं...

मान्य आहे,
आकर्षणात प्रेम केव्हा केव्हा दिसतं...
पण् जे चकाकतं
ते प्रत्येक् वेळीच् सोनं नसतं

मन् आपलं वेडं असतं
वेडं आपण व्हायचं नसतं..
मन मारुन जगण्यापेक्षा
वेळीच त्याला आवरायचं

अशावेळी....
आणि अशाच वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....

दोन दिवसांच आयुष्य...

दोन दिवसांच आयुष्य
पण फुलासारखं असावं
ऊन पावसाचे क्षण सारे
भरभरून जगावं

खुलावं चिखलातून
कधी बागेत बहरावं
सुख दु:खांच्या भ्रमरांना
कधी ओंजळीत धरावं

कधी प्रियकराच्या हातातून
प्रेयसीच्या हाती जावं
अश्या सोनेरी क्षणांचा
कधी साक्षीदार व्हावं

वधूवरांच्या सोबतीने
कधी शुभ-मंगल करावं
मनोरथ पूर्णं करण्या
चरणी ईश्वराच्याही जावं

सुखात कुणाच्या उधळावं
तर दु:खातहि सामील व्हावं
शोभून हार तुऱ्यातूनकधी सरणावरही जळावं.दोन दिवसांच आयुष्य
पण फुलासारखं असावं
ऊन पावसाचे क्षण सारे
भरभरून जगावं

.........तिच दुःख ............

आजचं तिच दुःख
कोणीच पुसू शकणार नाही
तिच्यात वाहणारा सागर
आज तरी थकणार नाही

तिचा तो अवतारच
सांगत होता
घडलेल्या घटनेला
पाहत होता
हुंदके तिचे आवरण्याचा
प्रयन्त तो करत होता

आधार द्यायला सोबत
होती तिची हि माउली
सावरणार तरी कशी ती
होती तिची ती सावली

थोडेच दिवस घालवले
तिने त्या सावलीसोबत
अजून हातही न लावलेला
आणलेल्या तिच्या बाहुलीसोबत

ओठातून शब्द ऐकण्यासाठी
किती आतुर असावी ती
आणि क्षणात अडीच महिन्यात
हातात नसावी ती

खेळ सुरु होण्याआधीच
संपला होता तिचा
नियतीने असा - कसा डाव
मांडला होता तिचा

तिच दुःख हे आज तरी
सावरणार नाही
अथांग वाहणाऱ्या सागराला
आज तरी अडवणार नाही.

आजही मला ते सर्व आठवतयं

आजही मला ते सर्व आठवतयं
जणू कालचं सारे घडल्यासारखं
तीच आयुष्याची मजा घेत
मित्रांच्या सहवासात बसल्यासारखं
अजुनही मला आठवतंय….
Lecture ला दांडी मारुन
बाजुचा परिसर फिरत बसायचो
फिरुन कंटाळा आला की
परत college कडे वळायचो
Canteen वाल्याला शिव्या घालत
बाहेरच्या café मध्ये जायचो
Café बंद असला की परत
Canteen मधलंच येऊन गिळायचो
Library card चा तसा कधी
उपयोग झालाच नाही
Canteen समोरच असल्यानेLibrary कडे
पावलं कधी वळलीच नाहीत
आमच्या group ला मात्र
मुलींची तशी allergy होती
कदाचीत college कडून ती
आमच्या group ला झाली होती
चालु तासाला मागच्या बाकावर
Assignment copy करायचो
ज्याची copy केली आहे त्याच्या
आधीच जाउन submit करायचो
खुप आठवतात ते दिवस…
सोबत रडलेलो क्षण आठवले की
आज अगदी हसायला येते
पण तेव्हा सोबत हसलेलो क्षण
आठवले की डोळ्यात चटकन् पाणि येतं………

सांग सख्या माझ्या सवे मैत्री तू करशिलका.............?

अंधारात रात्रीचा चंद्र तू होशील का............ ..?
अडकलता पाउले हात तुझा देशील का..........?
चुकता माझी पाउले राग तू कराशिला का...........?
सांग सख्या माझ्या सवे मैत्री तू करशिलका............ ...?

आली असता संकटे झेलुनी तू घेशील का..........?
काटेरी रस्त्यावर साथ माझी देशील का............ ......?
लापविता दुःख मी तास माझा घेशील का............ .......?
सांग सख्या माझ्या सवे मैत्री तू करशिलका............ ...?
 
माझ्या सवे मनामोकल्या गुजगोष्टी करशील का........?
समजुन माझ्या अडचणी सहानुभूति देशील का.......?
येता वाईट विचार मनी नवी उमेद होशील का.........?
सांग सख्या माझ्या सवे मैत्री तू करशिलका............. ...?
देशील माला प्रेम अणि माझे प्रेम घेशील का......?
कही क्षण जीवनात आनंदाचे देशील का..........?
ठेवशील मला मनी अणि आठवणीत राहशील का....?
सांग सख्या माझ्या सवे मैत्री तू करशिलका.............?

स्वप्नातला गाव....

स्वप्नातला गाव माझा
आज स्वप्न बनुन गेला
विसरत गेलो, विसरत चाललो
विसरुन गेलो मी त्याला...
स्वप्नांहुनही किती सुंदर
ह्या क्रुत्रिम शहरांपेक्षा
निसर्ग तेथे वास्तव्याला होता
हिरवी हिरवी गार पालवी
नदी नाल्यांची भांडणं होती
मुले ती तेथे झुला झुलवी
सकाळी सकळी मंदिरात
घंटा वाजत जायची
गाव माझा जागत होता
मंडळी भजन गायची
ते रस्ते करड्या मातीचे
खड्ड्यांचे कुठे दगडांचे
पण पावलांना आपले वाटे
मायेच्या पाऊलवाटांचे....
लोकांच्या जगण्यामध्ये
एक वेगळीच तर्हा होती
फाटके होते खिसे जरी
जगण्याची दौलत होती
त्याच माझ्या गावाला
सोडुन आलो कधीचा
नौकरीसाठी,पैशासाठी
म्हटलं कधी कधी चक्कर मारु
एकदिवस आपल्या गावाकडे
किती वर्ष निघुन गेले
पण तो दिवस आला नाही
गाव माझा बोलावतो आहे
मजला कधीचा...
तो उनाड रस्ता तसाच आहे
माझ्या बालपणीचा...
काहिच नाही बदललं अजुनही तेथे
मी मात्र बदललो...
काल स्वत:मध्ये गुंफलो होतो
आज संसारी गुंफलेलो...
माहित नाही आज तेथे
कसा काय हाल असेल...
स्वप्नांमधला गाव माझा
कदाचीत स्वनांतच दिसेल.....

काय सांगु माझ्या बद्दल ?

काय सांगु माझ्या बद्दल ?

मलाच काही कळत नाही

पानात पडेल ते खाल्ल्या शिवाय

पोटच आमच भरत नाही.

काय सांगु माझ्या बद्दलमलाच काही कळत

नाहीबोलायच खुप असत

मलापण बोलणं मात्र जमत नाही.

काय सांगु माझ्या बद्दलमलाच काही कळत

नाहीदुखवल जात आम्हाला

दुखवता आम्हाला येत नाही.

काय सांगु माझ्या बद्दलमलाच काही कळत नाही

खोट खोट हसता हसता

रडता मात्र येत नाही.

काय सांगु माझ्या बद्दलमलाच काही कळत नाही

दुःखात सुख अस समजता

दुःख ही फिरकत नाही.

काय सांगु माझ्या बद्दलमलाच काही कळत नाही

बरोबर बरेच असतात

पण एकटेपणा काही सोडत नाही.

काय सांगु माझ्या बद्दलमलाच काही कळत नाही

चार शब्द सांगतो

पण कोणी ऐकतच नाही.

काय सांगु माझ्या बद्दलमलाच काही कळत नाही

ज्यांना आम्ही मित्र मानतो

मित्र ते आम्हाला समजतच नाहीत.

काय सांगु माझ्या बद्दलमलाच काही कळत नाही

मांडायचा प्रयत्न करतोय

पण शब्द ही आम्हाला पुरत नाहीत

चव आयुष्याची...

एकदा मला आकाशात एक परी दिसली
हसली बघून माझ्याकड़े
म्हणते कशी मला.....
माग काय हव ते
मी म्हणाले...
सुन्दर आयुष्य दे मला
जिथे असेल फ़क्त सुख
नसेल कोणतही दुःख
ती म्हणाली देते
पण परत तक्रार नाही करयाची....
अणि झाल ही तसच
सुख सुख अणि नुसत सुख
ना घरात जागा ना मनात...
सुख कुठेच मावेना
शेवटी अश्रु आले डोळ्यात
माझ रडू ऐकून
परी आली धावून
म्हणते कशी सुखात का रडतेस?
तिला काय सांगायाच तेच कलेना
सुखच दुखते आपल्याला तेच उमगेना..
तीला म्हणले तुझ सुख घे
थोडस का होईना मला दुःख दे
दुख शिवाय काय किमत सुखाची....
कडू अणि गोड दोन्ही चव चाखु देना आयुष्याची

तुझ्या विना

क्षण एक हा जरासे आज हसून घेईन म्हणतो
हसता हसता नकळत थोडे, रडून घेईन म्हणतो…!

सुख-दु:खाच्या फूटपट्टीचे निकष लावुनी आयुष्या
सरणावर जाण्यापूर्वी, थोडे जगून घेईन म्हणतो…!

आयुष्याच्या या रंगपटावर खोटे खोटे जगताना
फसवुनी सत्यास, स्वप्नात रंगून घेईन म्हणतो…!

गेले ते दिन गेले सये तव सहवासाचे सोनसळी
साजिरे तव सहवासाचे, क्षण गुंफून घेईन म्हणतो…!

हा प्रवास युगा युगांचा तुजवीण नको नकोसा
तव आठवणींना सार्‍या, संगे बांधून घेईन म्हणतो…!

फरक कुठे पडला आहे….


 लहानपणी मी बाबांचा हात धरून मंदिरात जायचो|
त्यांचा हात धरून देवाला प्रदक्षिणा करायचो|
आताही मी त्यांच्या बरोबर मंदिरात जातो|
मंदिराच्या वाटेवर थकल्यावर त्यांना हात देतो|
आधाराचा हात बदलला म्हणून फरक कुठे पडला आहे|
बापलेकाच्या नात्यातला विश्वास अजुन तोच आहे|

लहानपणी चौपाटीवर आईकडे पाणीपुरीचा हट्ट धरायचो|
नाही म्हणाली तरी सोबत पाणीपुरी खायला लावायचो|
परवा चौपाटीवर आईने मला पाणीपुरी मागितली|
मनसोक्तपणे खा म्हणालो तेव्हा ती गोड हसली|
पाणीपुरी मागणारा बदलला तरी फरक कुठे पडला आहे|
मायलेकाच्या नात्यातला मायेचा ओलावा तोच आहे|

तेव्हा भाउबीजेला बाबंकडून ओवळणीचे पैसे घ्यायचो|
ओवळणी द्यायच्या आधी ताईला खूप चिडवायचो|
कमावता झाल्यापासून तिला काय पाहिजे विचारतो|
मात्र अजूनही ब्लेकबेरीची मागणी नोकियावर भागवतो|
ओवळणी बदलली तरी फरक कुठे पडला आहे|
राखीच्या धाग्यांमधला प्रेमळ बंध तोच आहे|

लहानपणी धाकटयावर दाद्ागिरी करायचो|
पण कुणी त्याला रागावला की पाठीशी घालायचो|
काल तोच धाकटा जेव्हा परीक्षेला निघाला|
पायाशी झुकून दादा आशीर्वाद दे म्हणाला|
थोरला असो की धाकटा फरक कुठे पडला आहे|
भावाकरता वाटणारी कळकळ तीच आहे|

कॉलेजात भेळपुरीवर वाढदिवस साजरा व्हायचा|
बसथांब्याच्या टपरीवर गप्पांचा तास रंगायचा|
आजही वाढदिवसाला पहाटेच प्रत्येकाचा फोन येतो|
सेलिब्रेष्नच्या निमित्ताने पुन्हा मित्रांचा मेळा भरतो|
शाळा कॉलेज संपुनही फरक कुठे पडला आहे|
मित्रांसाठीचा जिव्हाळा अजूनही तोच आहे|

जवळ असा की दूर , नाती रक्ताची की मनाची फरक कुठे पडतो|
मायेच्या आपल्या माणसांसाठी जीव आपोआप तळमळतो|