फक्त तुलाच हवा म्हणून

फक्त तुलाच हवा म्हणून,
मी आज तो चंद्र शोधाया निघालो...

आभाळातून तो,
चांदण्यांच्या नकळतच चोराया निघालो...
तुझ्या एका हास्यासाठी,
आज मी सार्या जगाशी भांडया निघालो... 

अन प्रत्येकाला हवा हवासा,
तोच चंद्र... आज मी फक्त,
तुझ्याचसाठी आणाया निघालो...

फक्त तुझ्याचसाठी...
... आणाया निघालो..

कळून चुकल तुला माझी काळजीच नाही

कळून चुकल तुला माझी काळजीच नाही,
ठरवलं खूप काही तर काहीही अवघड
नाही,

पण तुला विसरण एवढ सोपही नाही,
कल्पना केल्या होत्या मनाने खूप काही,

पण प्रत्यक्षात काही घडलच नाही,
म्हणून स्वप्नही आता कसली उरलीच नाही,

तुझ्याबरोबरच आयुष्य सुरु कराव मनात अस कधी येत नाही,
कारण माहित आहे तू माझ्यासाठी बनलेलीच
नाही,

का मी तुझी वाट नेहमीच पाहतो ?
का मी विनाकारण तुझ्याकडून अपेक्षा ठेवतो ?
शेवटी हेच कळत नाही...

जीवन हे एक रम्य पहाट....!!!!



जीवन हे एक रम्य पहाट

संकटांनी गजबजलेली एक वादळवाट !

सोनेरी क्षणाची एक आठवण !

सुख दुःखाचं ते एक गोड कालवण !

प्रेमाच्या पाझरांची वाहती एक सरीता !

नात्याच्या अतुट शब्दांनी गुंफलेली एक कविता !

जाणिवेच्या पलीकडचं एक जगावेगळं गांव !

यालाच आहे जीवन हे नांव !

- संग्रहित -

आजकाल छोट्या छोट्या गोष्टी पण feel होतात,

आजकाल छोट्या छोट्या गोष्टी पण feel होतात,
निराशेच्या दुखात सगळेच sence dull होतात,
कितीही थांबवलं तरी मन मात्र धाव घेतं,
आठवणींच्या कड्यावरून स्वतालाच झोकून देतं,
कोसळणाऱ्या सारी अन धुंद झालेली हवा,
आपसूक कोणीतरी छेडलेला पारवा,
              पण चिंब भिजलं तरी अंग कोराच वाटत,  


मनावर आलेला मळभ मात्र अजूच दाटत,
मोकळ्या हवेत पण कधी अडखळतो श्वास,
गर्दीत असतानाही होतो एकटेपणाचा भास,
मित्रांच्या संग्तीतही कधी मन मात्र एकटाच राहतं,
birthaday party तही एक मोकळी खुर्ची शोधत राहत,
वेड्या मनाला वाटत ते मित्रांना दुरावलय,
जणू काही काळाने त्यांचा सर्वस्व हरवलाय,

मनाला हवी फक्त मैत्रीचा कंकर,
जखमेवर मारलेली एक प्रेमळ फुंकर,
पण मनाचं दुखः हे मनालाच कळतं,
अश्रू मधून  कधी ते नकळत गळत...

गोष्ट अशी एका भेटीची ....




तिची अन् माझी अशी अचानकच पडली गाठ
दर्शनी पाहता तिला माझी लागली पुरती वाट

हृदयाचे ठोके जसे ढोल वाजत होते
लटपट लटपट पाय तालावर नाचत होते


डावी भुवई उंचावून तिने एक कटाक्ष टाकला
प्रथमदर्शी प्रेमाचा मिळाला मला दाखला

तिचे लुकलुकले डोळे अन् गुलाबही उमलले
प्रीतीच्या फुलांचे गंध माझ्या मनी दरवळले


क्षणभर सर्वत्र स्तब्ध निरव शांतता पसरली
नजरेने नजरेला दिलेली साद मात्र समजली

सावरून बावरून तिने परतीची वाट धरली
दोन क्षणांची साथ, पण मनात कायमची भरली


एकदा मागे वळून पहावे मनाने केला अट्टाहास
आहे हे सत्य का होतोय मज हा भास

तिची धावती पावले माझ्या रोखाने येत होती
हात पसरून मी मिठीत घेण्याची दुरी होती


मला दूर  सारून ती तशीच पुढे गेली
बिलगून
त्या व्यक्तीच्या दुचाकीवर स्वार  झाली
अशाप्रकारे माझ्या मनाचा झाला होता पचका

प्रथमदर्शी प्रेमाचा बसला मनाला धसका.................!!!!

असा का शेवट दिला....

BREAK UP नंतर पहिल्यांदाच त्यांची भेट झाली,

ती पण अचानक घडून आली....

त्याला पाहून तिचे डोळे पाणावले

पण ते अश्रू डोळ्यातून खालीनाही ओघळले.

बर झाल तू भेटलीस खूप दिवसापासून काही सांगायचे होते,

त्याच्या या बोलण्याने तिलाआपले पणा वाटला होता.

माझ आता लग्न ठरलय हे तुला सांगायचे होते,

त्याच्या या शब्दांने तिला क्षणात परक केल होते.

जड अंतकरणाने त्याला अभिनंदन केल,

नक्की येईल लग्नाला हे वचन पण दिल.

निरोप घेऊन तो निघून गेला

इथे अश्रूंचा पूर आला,

कस विसरला हा प्रेमाला हाच प्रश्न वारंवार निर्माण झाला.

कस विसरू शकला

कस पत्थर दिल झाला

सुंदर अशा प्रेमाला

असा का शेवट दिला

असा का शेवट दिला....