नुकताच मी

नुकताच मी
नदीवर जाऊन आलो
डोळ्यात साठलेलं एक तळं
अगदी थेंब थेंब पिळून आलो
वेळ होती ती किर्र रात्रीची
तरी नदीला भरती आली
तिलाच कळले नाही
कोणाची वेदना वरती आली
बांध तोडून काठाचा
ती गावभर फिरू लागली
माझा शोध घेण्यासाठी
हरेक घरात शिरू लागली
तिला ही पहायचं होत
कोणाच इतक दु:खी घर होत
मीही नित्य मिसळते सागराशी
पण कुठे त्याची पातळी वर येते
माझ्या घरापाशी ती येताच
एक थेंब माझ्या डोळ्यातून गळाला
मी वाहिलेल्या तळयातील अवशेषांशी
माझा गळलेला थेंब जुळाला
ओळखलं तिने मला
जागच्या जागी ती स्तब्ध झाली
नजर माझ्याशी मिळताचं
स्व:तास म्हणू लागली अभागी
म्हणाली,
आजवर माझा समज होता
जगातली सर्वात दु:खी मीच आहे
पण, तुझ्याशी मापल्यावर कळलं
माझे दु:ख किती कमीच आहे
रोज स्वत:स बुडवते सागरात
पण कधी कुठे फरक पडला
तू एकदाच दु:ख जाहीर केलसं
माझ्या अंत:करणातून पूर आला
मी म्हणालो.....
आपल्याहून सुखी जणांकडे पाहीलं
की आपणास आपण दु:खी वाटतो
आपल्याहून दु:खी जणांकडे पाहण्याचा
आपण प्रयत्नच कुठे करतो
जोपर्यंत ही वृत्ती बदलत नाही
तोपर्यंत हे असचं चालणार
सुख-समाधानात नांदणाराही
मी दु:खी आहे असचं बोलणार

आई जवळ हवी

आई जवळ हवी
थाम्बवायला गेलो वार तर वादळ आल्याशिवाय राहत नाही
जसच्या तस काहीकाही राहत नाही

पण जसच्या तस काहीकही राहत नाही
थान्बवायला गेलो वार तर वादळ आल्याशिवाय राहत नाही

धपाटा मारण्यासाठी का होईना पण वाटत
की आई जवळ हवी होतीअन दरवाज्यातल्या मोटारीपेक्षा वाटत
की जुनी सायकलच बरी होती
आदिदास असो वा रामदास असो आजीच्या
हातच्या लोणच्यापुढे सार काही दास आहे
त्याचीच आठवण येऊन आजमन मात्र उदास आहे
आठवणीच्या ह्या सावल्यान्कडे मी आजकाल पाहत नाही
थाम्बवायला गेलो वार तर वादळ आल्याशिवाय राहत नाही
पुर्वी छत्री हरवली होती आता छत्रहि हरवल आहे
प्रेयसीला लिहीलेल पहीलवहील पत्रही हरवल आहे

पावसाच्या प्रत्येक थेम्बाप्रमाणेतिची छबी नवी होती
नजर चुकवण्यासाठी का होईनापण ती जवळ हवी होती
एरवी मुसळधार पावसात चिम्ब भिजणारा मी
आज पावसाच्या वाटेलाही जात नाही
थाम्बवायला गेलो वार तर वादळ आल्याशिवाय राहत नाही

काळ बदलला वेळ बदलली देश बदलला वेष बदलला
नाती बदलली माती बदलली तरीसुध्दा
तरीसुध्दामन काही प्रवाहाबरोबर वाहत नाहीखरच....
थाम्बवायला गेलो वार तर वादळ आल्याशिवाय राहत नाही