मैत्रीच नात

संकट हि आयुष्याला जगण्याच बळ देतात,माणस सुद्धा संकटातच आपली खरी ओळख दाखवतात !
नातीगोती फक्त रक्ताचीच नसतात,
त्या हि पलीकडे हि मैत्रीची नाती असतात !!

सूर्य ढगाआड गेला कि सर्व काही बदलत,
आपली माणस सुद्धा कधी परक्या सारखी वागतात !
आपल्या डोळ्यातून आसव ढळत असतानाही,
कधी - कधी ती बेधुंद आनंदाने नाचतात !!

दोन पावलं एकट चालल्यावर मला कळाल,
स्वतःची सावली सुद्धा अंधारात साथ सोडत असते !
किती हि मोठा झाला माणूस तरीही,
शेवटी माणुसकी शिवाय शिल्लक काहीच उरत नसते !!

दोन सेकंदात आता हृदय जग सोडणार होत,
तेवढ्यात एका हाताने मला पुन्हा सावरल होत !
मी तर पूर्णतः स्वतःला संपवलाच होत,
थांबलेल्या श्वासाला त्याने पुन्हा का जाग केल होत ?

मैत्रीच्या नात्याला न रक्ताची गरज असते,
नाही त्याला कोणत्या गोष्टीची हाव असते !
हे नात फक्त दोन हृदयाचा ठाव असते,
खरंच जग संपेल हे कधी ,
पण मैत्रीच नात हे कधीच संपणार नसते !!
- संग्रहित

फक्त तुझ्यासाठी.....



ही अखेरची तुझी आठवण

यापुढे माझ्या मनात

तुझे येणे जाणे असणार नाही....

यापुढे तुझ्या आठवणींचं चांदणं

माझ्या मनात बरसणार नाही...

यापुढे कधीही तुझ्या आठवणींचा पाऊस माझ्या मनाच्या अंगणात

रिमझिमणार नाही....!

तुझा हळवा प्रेमळ आपलेपणा

जसा स्वीकारला होता

तसाच तुझा माझ्यावरचा रागही मंजूर...!

म्हणूनच हे अखेरचे काही अश्रू,

फक्त तुझ्यासाठी....

पण यापुढे माझ्या आसवांच्या मैफिली

तुझ्यासाठी जमणार नाहीत.......

आणि हे अखेरचे काही शब्द

फक्त तुझ्यासाठी.....

यापुढे माझ्या कविता

तुझ्या आठवणी मागणार नाहीत....

यापुढे कधीही माझ्या कविता

तुझ्यासाठी असणार नाहीत....

ही अखेरची तुझी आठवण....

यापुढे माझ्या मनात

तुझे येणे जाणे असणार नाही....

- संग्रहित -