"अनपेक्षित भेट"


आज पुन्हा तुझी-माझी भेट झाली...
माझ्या डायरीची पानं नवी-कोरी झाली....
समोर आलास सारं पुन्हा आठवले...
मिटलेले मनाचे दरवाजे अलगद उघडले...
पहिल्यांदाही अशीच नकळत भेट झाली
निम्मित पावसाचे अन भेटची वेळ वाढली....
अनेकदा भेटलो त्यानंतरही आपण...
मैत्रीने तुझ्या केले मनात घर..
वेडा वेडा व्हायचास बोलतांना माझ्याशी
खुप सारी मस्ती,थट्टाही जराशी..
तुझं सोबत असणं गॄहीतच धरलं मी...
मैत्रीशिवाय तुझ्या,आयुष्याचा विचारच नाही कधी...
पण कधीच नाही जाणल्या मी भावना तुझ्या...
मी तर रमले होते विश्वात माझ्या...
अचानक गेलास निघुन ,बोलला नाहीस काही,
पण सोबत नसणे तुझे सांगुन गेले बरच काही,
काळ चालत रहिला,अशीच वर्ष उलटली...
स्मॄतीनीं तुझ्या नेहमीच माझी साथ दिली...
हरले नाही मी,वाट पाहत राहीले तुझी,
येशील तु परतुन खात्री होती माझी,
आज पुन्हा भेटलो अगदी तसेच अनपेक्षित...
नजरेला नजरा भिडल्या,अन मनं झाली आनंदित...
आज तुझ्या नजरेतले भाव मात्र मी अचुकपणे हेरले..
नकळत माझ्याही त्यात होकाराचे सुर मिसळले..

तू असताना......

तू असताना......

प्रत्येक संध्याकाळी...ठरलेल्या वेळी.....
ठरल्याप्रमाने तुझी वाट बघताना...
तू उशीर करणार...हे माहिती असताना...
मी उगाचच कासावीस व्हायचो...
मग तुझ्याचसाठी घेतलेल्या गुलाबाची एक एक पाकळी...
she loves me....she loves me not...
असे करत तोडत जायचो...

नेहमीप्रमाने पुन्हा एकदा..
शेवटची पाकळी loves me not वरच अडायची...
मी उदास होउन बसताच...
तुझी हाक कानावर पडायची...
मी काहीही न बोलता..माझ्या मनातलं..
तू अगदी बिनचुक ओळखायचिस...
शेवटच्या पाकळीचे दोन भाग करून...
I will always love you...अस बोलायचिस..

आता तू नसताना...
अजुन देखिल माझी हरएक संध्याकाळी..
गुलाबाच्या पाकळ्यांसवेच सरते...
अन आज ही ती शेवटची पाकळी...
loves me not वरच अडते...
फरक फ़क्त इतकाच की....
आता तिचे दोन भाग करायला..
I will always love you अस सांगायला..
तू इथे नसतेस...

कॉलेज लाइफ़ "


कँटीन मधला चहा आणि
चहा सोबत वडा पाव
पैसे कुठ्ले खिशात तेव्हा
उधारीचचं खातं राव !

कट्ट्यावर बसणं लेक्चर चुकवून
आणि पोरींची चेष्टा करणं
दिसलीच एखादी चांगली तर
तिला लांबूनच बघून झुरणं !

बसलोच चुकून लेक्चरला तर
शेवटचा बाक ठरलेला
कुणाच्या तरी वहीतलं पानं
आणि पेन सुध्दा चोरलेला !

परिक्षा जवळ आली
कि मात्र रात्री जागायच्या
डोळ्यात स्वप्नं उद्याची
म्हणून झोपाही शहाण्यासारख्या वागायच्या !

पूर्ण व्हायचं एक वर्तुळ
एक वर्ष सरायचं
पुन्हा नव्या पाखरांसोबत
जुनं झाड भरायचं.

अशी वर्तुळ भरता भरता कळलं
अरे कागदच भरला !
वर्तुळ झाल्या कागदाला
फ़क्त सलाम करायचा उरला !!

पुन्हा नविन रस्ता
पुन्हा नविन साथी
जुन्या रस्त्याच्या , प्रवासाच्या
फ़क्त आठवणीच हाती !!!!!!

प्रेम नावाचा "टाईमपास"


                    
http://wallpapers.oneindia.in/d/194930-2/love-aaj-kal03.jpg

त्याची अन तिची पहिली भॆट
दोघांची होणाऱी "नजऱभेट"
काळजाला जाऊन भिडणारी थेट
दोघांचं एकमेकांना पाहून हसणं
अन नाजुकशा जाळ्यात अलगद फसणं...
या हसण्या या फसण्याची
सवय झालीय सगळयांना...

नजऱभेटीचं रूपांतर चोरून भॆटीत
भेटीचं रूपांतर हळुवार मिठीत
अन त्याहीपुढे कित्येक पटीत
नात्यातल्या या वेगाची
सवय झालीय सगळयांना...

मग रंगू लागतात स्वप्नं
एक त्याचं,एक तिचं फक्त दोन मनं
त्याचं हसणं तेव्हा तिचं हसणं
तिचं रडणं तेव्हा त्याचं रडणं
या हसण्या या रडण्याची
सवय झालीय सगळयांना...

दिल्या जातात वेळा,पाळल्याही जातात वेळा
घेतल्या जातात शपथा दिल्या जातात उपमा
त्याला ती वाटते "रांझ्याची हीर"
तिलाही तो वाटतो "कपूरांचा रणबीर"
या शपथा या उपमांची
सवय झालीय सगळयांना...

मग येतो असाही एक दिवस
पूनवेची रात्र वाटू लागते अवस
दोघांनाही येऊ लागतो एकमेकांचा कंटाळा
हीर वाटू लागते "बधीर" अन
रणबीर वाटू लागतो चक्क "काळा"
या अवसेची या पूनवेची
सवय झालीय सगळयांना...

पहिल्या भेटीच्या चौकातच
फूटतात "नव्या वाटा"
दोघंही करतात एकमेकांना "टाटा"
अहो तु्म्ही कशाला होताय डिस्टर्ब
दुःख वैगरे विसरा
त्याला भॆटते दूसरी
तिलाही भॆटतो दूसरा
पुन्हा होते देवाणघेवाण,पुन्हा होते "दिलफेक"
पुन्हा जुन्या कहानीचा नव्याने "रिटेक"
बदलत्या प्रेमाच्या रंगाची
सवय झालीय सगळयांना...

खरं सांगायचं अगदी मनापासून तर
प्रेम नावाचा "टाईमपास" करण्याची
सवय झालीय सगळयांना....
._,___

तू राहशील का माझी....

उरलेल्या ह्या श्वासांची शप्पत
साथ तुझी सोडणार नाही
हा पाऊस नसला तरी
माझे बरसने थाबंनार नाही || १ ||

डोळे मिटून घे अन्
घे हा मातीचा सुगंध
त्यातही शेवटी येईल तुला
फ़क्त माझाच मंद गंध || २ ||

तू असे म्हणतेस
की तुझ्या आठवणीवर जगायचेय
माझ्या आठवणी असताना
मला सोबतीला का घ्यायचेय ? || ३ ||

तू नाही आता एकटी
मीही तुझ्या साथीला आहे
मृगजळ नाही तर
माझ्या प्रेमाचा वर्षाव आहे || ४ ||

म्हणुन खरे सांगतो तुला
मला हवीय सोबत तुझी
मी आहे फ़क्त तुझा
तू राहशील का माझी ? || ५ ||

तू नव्हतीस तेव्हा
जीवन माझे होते व्यर्थ
तुझ्या साथीमधेच माझ्या
जीवनाला आहे अर्थ || ६ ||

कवी : प्रताप

घराकडे येताना ....



घराकडे येताना मला काल पावसाने गाठले,
जोरदार होता पाउस, सगळीकडे तळे साठले....!

भिजत-भिजत जात होतो घराकडे...तेवढ्यात आवाज दिला कोणी,
वळून बघता मागे, दिसली आमच्या कॉलेजची राणी...!

जिच्यावारती झुरत होतो, जी देत नव्हती मला भाव,
तिने साद घालून काळजावरती केला 'प्रेमळ' घाव...!

तीही होती भिजलेली, अंगात थंडी भरलेली,
लाल पंजाबी ड्रेस, अन् त्यावर matching लिपस्टिक लावलेली...!

"भिजत कशाला जातोस...? पाउस जाईपर्यंत माझ्या घरी थांब",
"राहते जवळच मी, नाही जास्त लांब...."

ऐकून शब्द तिचे ते पावसात आला मला घाम,
टाळण्यासाठी म्हटलो मी, "मला आहे जरा काम...!"

बराच आग्रह करून ती मला घरी घेउन गेली,
स्वत:च्या हाताने तिने मग कॉफी तयार केली...!

कॉफी देताना तिच्या चेह~यावरचा पाण्याचा थेंब कपात पडला,
त्यामुळे कदाचित कॉफीचा गोडवा अजुनच ज़रा वाढला...!

अचानक तिला आमच्या प्रेमाचा साक्षात्कार कसा हो घडला...?
लाजत म्हटली, "तुझ्या प्रेमाचा ज्वर मजवर चढला...!!!"

"उठ रे मेल्या...! कॉलेजात जायचे की नाही...?"
स्वप्न होते, सत्य नाही... झोपेतून उठवत होती आई...!

स्वप्न आठवून हसलो जरासा
कॉलेजात जेव्हा दिसली राणी,

आलीस माझ्या आयुश्यात.





 
आलीस माझ्या आयुश्यात सोनेरी पहाट बनुन,
देशील मला आयुष्यभराची साथ् माझी प्रेयसी बनुन............

मन माझे उदास होते जणु कोमेजलेले फुल,
आता तुझ्याच सोबत मांडायचि आहे मला जन्मो-जन्मीची चुल.........

कशी अवतरलिस तु या भुतालावर काय सांगु,
सर्व अपेक्षा पूर्ण झाल्या आता देवाकडे काय मागु...........

असायचो एकटाच मी विरहाच्या क्षणात बुडालेला,
कस समजवु तुला प्रेमावरचा विश्वासच माझा उडालेला.......

तुझ्या येण्याने परत मनात अंकुर फुलवला आहे,
माझ्या अंगणात मी परत स्वप्नांचा झूल़ा झुलवला आहे.........

ह्या झुल्यावर आयुष्यभर तुझ्यासंगे मला झुलू दे.....
आणि तुझ्या मिठीतच नेहमी हि सोनेरी पहाट मावळू दे.

साभार कवी : प्रथमेश राउत..

सांगेन मी केव्हातरी...


गुपित माझ्या मनाचे
सांगेन मी केव्हातरी
जे दडले मौनात ते शब्दात
मांडेन मी केव्हातरी...

दाटलेल्या आसवांचा अर्थ
सांगेन मी केव्हातरी
अस्वस्थ श्वासाची घुसमट
जाणवेल तुला केव्हातरी...

तुझ्या सावलीचा आभास
सांगेन मी केव्हातरी
अंधारातला माझा भास
होईल तुला केव्हातरी...

जपलेल्या क्षणांचा हिशोब
सांगेन मी केव्हातरी
ओंजळीतल्या आसवांना
सांडेन मी केव्हातरी...

अबोल वेदना मनातील
सांगेन मी केव्हातरी
मुकी प्रीत माझी
कळेल तुला केव्हातरी...

तू आणि माझी कविता ........


 
 
तुझ्या मुलेच तर माझ्या कवितेला जोड आहे,
म्हणूनच कि काय मला तुम्हा दोघींची इतकी ओढ आहे.

खर तर तू आणि कविता दोघी एकाच माळेचे मणी,
विसरू नाही देत मला तुम्ही दोघीही जणी.

तूच आहेस कविता माझी, अन कवितेतही तूच असतेस,
तू जवळ नसतेस तेव्हा तीच जवळ येऊन बसते.

अशाच घट्ट राहू देत तुमच्या प्रेमळ भेटी गाठी,
तू माझ्या कविते बरोबर अन मी तुम्हा दोघांसाठी.

माझ्यावर कविता नको करूस असे देखील बोलतेस तू,
कवितेत येऊन माझ्या प्रेमाचे सारे राज खोलतेस तू.

कितीही नाही बोललीस तरी माझ्या कवितेला माहित आहे,
अखेर माझ्या सोबत तीही तुझीच वाट पाहीत आहे.

श्वास आहे ती माझा म्हणूनच कविता करून जगतो,
काही नको मला देवाकडे, सार तुझ्याच साठी मागतो.

आज वेळ नाही....


अमाप सुख आहे सगळ्यान्च्याच
पदरात पण ते अनुभवयला
आज वेळ नाही.....

आईच्या अन्गाईची जाणिव आहे
पण आईला आज
'आई' म्हणायलाच वेळ नाही.....

सगळी नाती संपवुन झालीत
पण आज त्या नात्यान्ना
पुरायलाही आज वेळ नाही.....

सगळ्यान्ची नाव मोबाईल मध्ये सेव आहेत
पण प्रेमाचे चार शब्द
बोलायलाही आज वेळ नाही.....

ज्या पोराबाळान्साठी मेहनत दिवस-रात्र करतात
त्यान्च्याकडे क्षणभर
बघायलाही आज वेळ नाही....

सान्गेल कोण कशाला दुस-याबद्द्ल
जेव्हा ईथे स्वतःकडेच
बघायला वेळ नाही......

डोळ्यावर आलीये खुप झोप
पण आज कोणाकडे
झोपयलाही वेळ नाही.....

ह्रुदयात वेदनान्चा पुर वाहतोय
पण त्या आठवुन
रडायलाही वेळ नाही....

परक्यान्ची जाणिव कशी असेल
जर ईथे आपल्याच माणसान्साठि वेळ नाही...

आयुष्यात पुढे जाण्यासाठी चाललेल्या
या संघर्षात जरा माग वळुन
पहायलाही वेळ नाही........

अरे जीवना तुच सान्ग
जगण्यासाठीच चाललेल्या या धावपळीत
जगायलाच आज वेळ का नाही?

*हे दिवस चांगले की कॉलेजचे ...



तेव्हा पैसे जमवून पेट्रोल भरायचो..
लांब लांब फिरायला जायचो...
आता tank फुल्ल असूनही...
मित्रांना मुकलो....

टपरी वरचा चहा CCD मधल्या cofee मधे बदलला,
पण हा फरक मनाला नाही पटला..

Pre-Paid Card वरुन बोलायची तेव्हा मजा यायची...
आता postpaid असूनही बोलायला नाही कुणी..

ऑफीस मधे बसल्या बसल्या विचार करत होतो,....
हे दिवस चांगले की कॉलेजचे ...

दिवस बदलले ... General class मधून Business Class झाला.
पण फिरायला आता वेळ नाही उरला...

तेव्हा Second hand का होईना Desktop असावा असे .वाटत..
आजकाल Branded Laptop असूनही चालू करावा नाही वाटत...

खरी मैत्री Proffesional frenz मधे बदलली
पण त्या...मैत्रीची सर नाही आली....

ऑफीस मधे बसल्या बसल्या विचार करत होतो,....
हे दिवस चांगले की कॉलेजचे ...*

जेव्हा तु उदास असायचीस..............



जेव्हा तु उदास असायचीस ...........

जेव्हा तु उदास असायचीस
एखाद्या दुख:त खोलवर बुडायचीस
तेव्हा मी तुझ्या ओझरत्या
नजरेकडे पहायचो
ओठावर हसु ठेवत
मी वेड्यासारखा बडबडायचो
तेव्हा वाटायचं मला
कि मला आनंदात पाहुन
तु तुझं दु:ख विसरशील
माझ्य़ाकडे पाहुन मोहक हसशील............

पण...

तेव्हा तु म्हणायचीस
"तुला काहीच कसं रे वाटत नाही?
एखाद्या वेदनेचे भाव तुझ्या चेह-यावर कसे कधीच दिसत नाही??"

पण आता

जेव्हा तु नाहीस
मग या डोळयात आसु ठेऊन
मी सारखा तुझा विचार करतोय
वेदनेच्या प्रत्येक पावसात एकटाच भिजतोय
अजुनही मन माझ तोच प्रश्न विचारी
कि "तु मझि होशिल?"
माझी ही अवस्था पाहुन
उद्या कदाचीत तु परत येशील
तोवर माझे हे आसु पण सुकतील
तुला पाहुन माझे हे
हसु विसरलेले ओठ पुन्हा हसतील
माझ्या त्या हास्याकडे पाहुन तु पुन्हा

तेच म्हणशील

"तुला काहीच कसं रे वाटत नाही
एखाद्या वेदनेचे भाव तुझ्या चेह-यावर कसे कधीच दिसत नाही.......???

का कुणास ठाऊक ...


हळव्या क्षण माझ्या
तुझी याद येते
का कुणास ठाऊक
आजही मनी हुरहूर दाटते !!

ओल्या पापण्यात माझ्या
तुझे स्वप्न विरते
का कुणास ठाऊक
आजही मनी हुरहूर दाटते !!

हळुवार स्पर्शात माझ्या
तुझे स्पंदन जाणवते
का कुणास ठाऊक
आजही मनी हुरहूर दाटते !!

उगाच मौनात माझ्या
तुझे शब्द रेखाटते
का कुणास ठाऊक
आजही मनी हुरहूर दाटते !!

सांडलेल्या ओंजळीतून माझ्या
तुझी आठवण वेचते
का कुणास ठाऊक
आजही मनी हुरहूर दाटते !!

थांबलेल्या क्षणातून माझ्या
तुझा क्षण वगळते
का कुणास ठाऊक
आजही मनी हुरहूर दाटते !!
का कुणास ठाऊक ...

कुणाला कुणी असं सोडुन का जातं?

 

 
मनाशी मनं आधी जुळवायची कशाला?
जुळलेली मनं पायदळी मग तुडवायची कशाला?
कधि फ़ुलपाखरु होऊन बागडणा-या मनास
काट्यांतच मग खुडावं लागतं.....
कुणाला कुणी असं सोडुन का जातं?

होऊन चांदणं आपल्यावर कुणी बरसुन घेतं
बरसतानाच नकळत हरवुनही जातं
भर चांदरातीही मनास मग
एकट्यालाच झुरावं लागतं...
कुणाला कुणी असं सोडुन का जातं?

कुणास कुणी कधि आपलं म्हणु नये
झालात कुणाचे कधि तर दुर जाउ नये
वाळवंटी या जगात
एकट्यालाच मग जगावं लागतं...
कुणाला कुणी असं सोडुन का जातं?

मी जगुन घेते  एकटी
माझ्याशीच मी हसुन घेते  एकटी
तरी एकटीलाच मला  रोज रोज  मरावचं लागतं...
कुणाला कुणी असं सोडुन का जातं?

" हो ..... मलाही ! "

तिला ठाऊक होतं ...त्याचं आपल्यावर अतोनात प्रेम आहे
तिचंही होतंच, कदाचित त्याच्यापेक्षा जास्तच !
दोघंही प्रेम करत होते एकमेकांवर जीवापाड ...
दोघांना ही होती मनापासून याची जाणीव ...
त्यालाही काही विचारायचं होतं ,
तिलाही काहीतरी बोलायचं होतं ,
पण ... दोघांनी सारं मनातच ठेवलं होतं !
शेवटी तिला सुचली एक कल्पना ...
नेहमीप्रमाणे भेटले दोघे एकदा एकांतात ...
ती लाडात येऊन म्हणाली ,
काल मला एक स्वप्नं पडलं ...
स्वप्नात कोणीतरी मला propose केलं ...
" will you marry me ? "
त्याने न राहवून विचारलं, मग उत्तर काय दिलंस ?
ती म्हणाली " हो शिवाय दुसरं काही सुचलंच नाही "
त्याने उत्सुकतेने विचारलं " कोण होता ? सांगशील का ? "
ती लाजून म्हणाली " वेड्या ! तूच , आणखी कोण ? "
तो खूश झाला, तिचा चेहरा आपल्या हातात धरून म्हणाला
" खरंच ? माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं "
ती गालातल्या गालात हसली ... आणि म्हणाली
" हो ..... मलाही ! "

शब्दांना गुंतवु कसा मी

तुझ्या बद्दल सांगु काय मी
शब्दांना गुंतवु कसा मी
रात्रीच्या आठवणी नंतर
सकाळच्या सोनेरी उन्हामध्ये
उमलते एखादे फुल.
टपोर्‍या डोळ्यावरील पुसत दव बिंदू
हास्य रंगाचे चेहर्‍यावर घेऊन
सुगंधाची करत बरसात
उमलते एखादे फुल.
नाजुक पाकळी ओठांची
किंचित विलग
आश्वासक शब्दांचा दिलासा देत
तुझ्या बद्दल सांगु काय मी
शब्दांना गुंतवु कसा मी

एकदा का होइना प्रेम करून बघ..

आयुष्याची दोरी कुणाच्या तरी हातात देऊन बघ..
खुप वेळ असेल तुझ्याकडे..
आयुष्यातील दोन क्षण कुणाला तरी देऊन बघ..
कविता नुसत्याच नाही सुचणार
त्या साठी तरी एकदा प्रेम करून बघ..
खुप छान वाटत रे..


सर्वात सुंदर भावनेला अनुभवुन बघ
नुसता तडफातडफी निर्णय घेऊ नकोस..
ह्या गोष्टींचा पण विचार एकदा का होइना करून बघ..
नुसतच काय जगायच..
जिवंतपणी मरण काय असते ते अनुभवुन बघ..
एक जखम स्वतः करून बघ..


स्वताच्या पायावर कुर्हाड़ मारून बघ...
नुसत सुखच काय अनुभवायचे..
दुखाच्या सागरात एक डूबकी मारून बघ..
विरहाच्या तलवारीचे घाव सोसून बघ..
थोड्या जखमा स्वतः करून बघ..
रिकाम काय चालायच..?


आठवणीचे ओझे काय असते ते एकदा पेलुन बघ..
रडत असलेले डोळे लपवत..
एकदा हसण्याचा प्रयत्न करून बघ..
सोपं नसत रेएकदा रडून बघ..
तुझ्या अश्रुंची चव चाखून बघ..
सांगण्याचा हेतु एवढाच की..
एकदा का होइना प्रेम करून बघ..

माझी ती अशी असावी...

माझी ती अशी असावी,
जगात दूसरी तशी नसावी,
मलाच सर्वस्व माननारी,
माझी ती अशी असावी\\१\\

प्रानजळ असावी, अवखळ असावी,
परी ती अगदी सोज्वळ असावी,
सर्वांना अगदी आपलं माननारी,
माझी ती अशी असावी\\२\\

फारच सुंदर, फारच गोरी,
फारच देखणी पण नसावी,
मजवर भरपूर प्रेम करणारी,
माझी ती अशी असावी\\३\\

आपली माणसं, आपलं घर,
आपलेपणा जपणारी असावी,
ससूलाही आई म्हणनारी,
माझी ती अशी असावी\\४\\

चाणाक्ष, हुशार, व्यवहारी,
आयुष्यातील सल्लागार व्हावी,
माझ्या चुका लक्षात घेणारी,
माझी ती अशी असावी\\५\\

माया, प्रेम आपुलकी,
हे सर्व देणारी असावी,
माझी ती कशी असावी?
माझी ती अशी असावी\\६\\ 

पहिली मैत्री..... पहिलं प्रेम..!




पहिली मैत्री..... पहिलं प्रेम..!
नकळत तुझं मित्रत्व
मी जेव्हा हसून स्वीकारलं होतं
माझ्या भावनांचं विश्व
तेव्हाच विस्तारलं होतं

तुला रोज बघणं
आयुष्यातली एक सवय बनत गेली
तुझ्या फोनची वाट पाहण्यात
संध्याकाळ माझी विरत गेली

तू समोर आल्यावर
शब्द सारेच पळून जायचे
तू गेल्यावर मग मात्र
काय काय सांगायचं होतं
याची आठवण करून द्यायचे

तुझ्या पहिल्याच हास्यात मी
पूर्णपणे डूबायचे आणि
आपल्या मैत्रीच्या वेलीला
आणखीनच जपायचे

मैत्री एवढी सुंदर असते
हे तुझ्या रूपाने जाणवलं
मनाला मोहवणाऱ्या प्रत्येक
गोष्टीत त्या वेळी तुझंच रूप दिसलं

धबधब्यासारखे दिवस वाहत
राहिले असताना तुझ्या सहवासात
मैत्री नकळत मागे पडली
आणि एक प्रेमांकुर उमलला मनात

स्वभाव तुझा मी रोज
पडताळून बघायचे
रोजच्या बोलण्यात मात्र
नवीनच अनुमान निघायचे

तू दिसला नाहीस कधी
तर मेघ डोळ्यात उतरायचे
आणि घरी परत जाताना
मला चिंब भिजवायचे

परत दुसऱ्या दिवशी तू
त्याच गोड चेहऱ्याने हजर
सगळं विसरून पुन्हा तुला
बघायला आतुर असायची नजर

पण सुखाची चाहूल दुःख घेतं
तसंच काहीसं झालं
मैत्री आणि प्रेम मिश्रित हे
नातं एका गैरसमजामुळे विरत गेलं

कदाचित चूक नव्हती
दोघांचीही ,पण जिद्द
होती ना
आपापला इगो मिरवण्याची

मनातली ठसठस जेव्हा
खूपच तीव्र झाली
मैत्रीने एक पाउल पुढे
टाकलं ,आणि मी माघार घेतली

हो , मी माघार घेतली
आणि इगो सोडून दिला
कारण तू दिलेल्या दुःखापेक्षा
मला तू स्वतः जास्त मोलाचा वाटला

तू सुद्धा मनातलं किल्मिष
काढून टाकलस
आणि हसून मी तुझ्या
सोबत आहे , हे
दाखवून दिलंस ....

आता तू असतोस सोबत
म्हणून मी स्वतःवरच खुश असते
रोजचीच संध्याकाळ आता
अजूनच छान दिसते

वाटतं एकदा सांगून टाकावं
मनातलं गुपित सारं
दुसरयाच क्षणी जाणवतं
समजल्यावर सगळं तू
अजूनच दूर गेलास तर ?

मला माहित आहे रे ,
तुझ्या पसंतीत मी
कुठेच बसत नाही ,
पण काय करू , मन
असं धावतं कि थांबतच नाही

एकदा हो म्हणून तर बघ ,
तुझ्यासाठी पूर्णपणे स्वताला बदलेन
तुझ्या वाटेतले काटे पापण्यांनी
उचलून फक्त फुलंच त्यावर पसरेन

मला तुला आयुष्यात
खूप सुखी झालेलं बघायचंय
रात्री झोपशील ना जेव्हा,
तेव्हा तुझ्या चेहऱ्यावरचं
समाधानाचं हसू , हळूच
डोळ्यांनी टिपायचय ''

मी आणि माझी लेखणी यांत रंगलेला एक छोटासा संवाद...........



आज माझी लेखणी म्हणाली............
का रे तू मला सारखं सतावत असतोस
तुझ्या फावल्या वेळात मला त्रास देत असतोस ??
खरंच मी दमले रे आता मलाही जरा एकांत हवाय
सारखा लिहित असतोस तू कुठेतरी पूर्णविराम हवाय

मी म्हटलं........
अग माझं काही चुकलं असेल तर स्पष्टपणे सांग मला
पण असं अर्ध्या वाटेत एकट सोडून जाऊ नकोस
तुलाहि आराम हवाय हे कळलंय आता मला
त्यामुळे उगाच अशी चिडू नकोस

ती (लेखणी)...........
अरे मी तुझ्यावर चिडले व रागावले नाही पण मलाही थोड समजून घे
शब्द तुला सारखे सुचत असतात परंतु मलाहि क्षणभर निवांत श्वास घेण्याची मोकळीक दे
काही दिवस मलाही तुझ्यापासून दूर जावून बघायचंय
तुला माझ्याविना जमेल का राहायला मला जाणून घ्यायचयं

मी........
आईबाबा,भाऊ,बहिण हि नाती रक्ताची आहेत
पण शब्द आणि लेखणी हि दोघे माझी जिव्हाळ्याची नाती............
जेव्हा लिहायला सुरुवात केली ह्यांचीही रक्ताच्या नात्यांत भर पडली
अन तेथूनच पुढे मला तुजसंग जगण्याची सवय जडली

मी..............
शेवटी एवढंच म्हणेन तुला
"माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तू (लेखणी) मला सोबत हवी
तुझा मित्र म्हणून जगायला आवडेल मला नाही व्हायचंय कवी "..................!!!!

तू येतोस का रे माझ्याबरोबर देव शोधायला?...



नक्की हा प्रकार आहे तरी काय?

उत्सुकता माझ्यासारखी असेलच तूला म्हणून विचारतोय...


गल्लोगल्ली, चौकात, मंदिरात आम्ही दोघे दिवसरात्र फिरलो...

नवसाला पावणारा, लोकांच्या मनातले जाणणारा सर्वांना भेटलो...


तरीही तो सापडत कसा नाही याचे आश्यर्य वाटले...

शोध घेताना जवळपासचे सारे काही संपले...


तरी शोध त्याचा अखंड चालूच ठेवला...
 
थकलो खूप... भुकेने व्याकुळ झालो...


फिरता फिरता एका झोपडीचा आसरा घेतला विश्रांतीला...


म्हाताऱ्यान झोपडीतल्या लगबगीने विचारल...

खूप थकलासा... थोडी चटणी भाकर खावून घ्या... बरं वाटल...


अर्ध्याच भाकरीत पोट गच्च भरलं कस हे तो देवच जाणे...


आम्हाला भाकरी देणारा म्हातारा स्वत: उपाशी पोटी

स्मित हास्य करत आमच्याकडे पाहत होता...


देव फिरत शोधणं व्यर्थ होत...

तो कुठेही कोणत्याही रुपात गवसतो...

कधी आणि कुणातही सापडतो...

हे त्या म्हाताऱ्याला भेटल्यानंतर प्रकर्षाने जाणवलं...


तो आपल्या आत आहे... प्रत्येकात आहे हे नव्याने उमगले....

आणि त्याच्या ह्या लीलेला साष्टांग नमस्कार केला...

 

जेव्हा तु उदास असायचीस ...........



जेव्हा तु उदास असायचीस
एखाद्या दुख:त खोलवर बुडायचीस
तेव्हा मी तुझ्या ओझरत्या
नजरेकडे पहायचो
ओठावर हसु ठेवत
मी वेड्यासारखा बडबडायचो
तेव्हा वाटायचं मला
कि मला आनंदात पाहुन
तु तुझं दु:ख विसरशील
माझ्य़ाकडे पाहुन मोहक हसशील............

पण...

तेव्हा तु म्हणायचीस
"तुला काहीच कसं रे वाटत नाही?
एखाद्या वेदनेचे भाव तुझ्या चेह-यावर कसे कधीच दिसत नाही??"

पण आता

जेव्हा तु नाहीस
मग या डोळयात आसु ठेऊन
मी सारखा तुझा विचार करतोय
वेदनेच्या प्रत्येक पावसात एकटाच भिजतोय
अजुनही मन माझ तोच प्रश्न विचारी
कि "तु मझि होशिल?"
माझी ही अवस्था पाहुन
उद्या कदाचीत तु परत येशील
तोवर माझे हे आसु पण सुकतील
तुला पाहुन माझे हे
हसु विसरलेले ओठ पुन्हा हसतील
माझ्या त्या हास्याकडे पाहुन तु पुन्हा

तेच म्हणशील

"तुला काहीच कसं रे वाटत नाही
एखाद्या वेदनेचे भाव तुझ्या चेह-यावर कसे कधीच दिसत नाही.......???

हो ..... मलाही ! ( Love Story )


तिला ठाऊक होतं ...त्याचं आपल्यावर अतोनात प्रेम आहे
तिचंही होतंच, कदाचित त्याच्यापेक्षा जास्तच !
दोघंही प्रेम करत होते एकमेकांवर जीवापाड ...
दोघांना ही होती मनापासून याची जाणीव ...
त्यालाही काही विचारायचं होतं ,
तिलाही काहीतरी बोलायचं होतं ,
पण ... दोघांनी सारं मनातच ठेवलं होतं !
शेवटी तिला सुचली एक कल्पना ...
नेहमीप्रमाणे भेटले दोघे एकदा एकांतात ...
ती लाडात येऊन म्हणाली ,
काल मला एक स्वप्नं पडलं ...
स्वप्नात कोणीतरी मला propose केलं ...
" will you marry me ? "
त्याने न राहवून विचारलं, मग उत्तर काय दिलंस ?
ती म्हणाली " हो शिवाय दुसरं काही सुचलंच नाही "
त्याने उत्सुकतेने विचारलं " कोण होता ? सांगशील का ? "
ती लाजून म्हणाली " वेड्या ! तूच , आणखी कोण ? "
तो खूश झाला, तिचा चेहरा आपल्या हातात धरून म्हणाला
" खरंच ? माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं "
ती गालातल्या गालात हसली ... आणि म्हणाली
" हो ..... मलाही ! "

तू राहशील का माझी...

उरलेल्या ह्या श्वासांची शप्पत
साथ तुझी सोडणार नाही
हा पाऊस नसला तरी
माझे बरसने थाबंनार नाही || १ ||

डोळे मिटून घे अन्
घे हा मातीचा सुगंध
त्यातही शेवटी येईल तुला
फ़क्त माझाच मंद गंध || २ ||

तू असे म्हणतेस
की तुझ्या आठवणीवर जगायचेय
माझ्या आठवणी असताना
मला सोबतीला का घ्यायचेय ? || ३ ||

तू नाही आता एकटी
मीही तुझ्या साथीला आहे
मृगजळ नाही तर
माझ्या प्रेमाचा वर्षाव आहे || ४ ||

म्हणुन खरे सांगतो तुला
मला हवीय सोबत तुझी
मी आहे फ़क्त तुझा
तू राहशील का माझी ? || ५ ||

तू नव्हतीस तेव्हा
जीवन माझे होते व्यर्थ
तुझ्या साथीमधेच माझ्या
जीवनाला आहे अर्थ || ६ ||

आठवतय.........????

आठवतय, आपण दोखे एकत्र असताना,
आपण केलिली प्रेमाची साठवण...
तू आज माझ्या सोबत नसताना,
कशी काय येणार नाही त्या दिवसांची आठवण...
आठवतय, आपण दोखे घरात एकत्र असताना,
त्या एकांतात मी तुझा घेतलेला चुंबन...
तू आज माझ्या सोबत नसताना,
उजाड़ दिसत आहे माझ्या घरच आंगन...

आठवतय, आपण दोखे गोड स्वप्न रंगवत असताना,
ठरवले होते प्रेमळ आयुष्याचे पुढचे क्षण...
तू आज माझ्या सोबत नसताना,
माझे आयुष्यच झाले आहे अता निर्जन...

आठवतय, मला जोराची भूक लागली असताना....
तू अगदी प्रेमाने भरवले होतेस मला जेवण...
तू आज माझ्या सोबत नसताना,
मी अता काहीही करत नाही कसले सेवन...

आठवतय, आपण दोखे खरेदी करत असताना,
आपले एकमेकांवर असलेले प्रेमच होते खरे धन...
तू आज माझ्या सोबत नसताना,
तुझ्याच नावाने साजरे करतो मी प्रत्येक सण...

आठवतय, मी माझ्या दुखात रडत असताना,
तू उघडलेस माझ्यासाथी आपल्या प्रेमाचे आलिंगन...
तू आज माझ्या सोबत नसताना,
सुखात सुद्धा मी करत आहे स्वतःशीच भांडण...

आठवतय, आपण कुठे ही भेटत असताना...
फ़क्त प्रेमाचच बोलायचो आपण काही पण...
तू आज माझ्या सोबत नसताना,
माझ ते बोलन संपल नाही आहे अजून पण....

आठवतय, आपले प्रेम कठिन परिस्थिति असताना,
दोखानी मिळून घेतले होते अमर प्रेमाचे प्रण....
तू आज माझ्या सोबत नसताना,
हताश होऊंन घेतले मी एका कोपरयाचे शरण...

आठवतय, आपण दोखे एकमेकाना भेटत असताना,
फ़क्त आपले प्रेम आणि दोखे आपण...
तू आज माझ्या सोबत नसताना,
शत्रु वाटतात मला अता प्रत्तेक जन...

आठवतय, आपण दोखे लांब एकमेकांपासून असताना...
जगन कठिन झाले होते हे प्रेमाचे जीवन..
तू आज माझ्या सोबत नसताना,
तुझी आठवणच झाले आहे माझे सहजीवन...

ऐ बघ ना मी आता आलोय..

ऐ बघ ना मी आता आलोय..
तुझ्याच प्रेमात मी पूर्णपणे न्हालोय
माझी चुक झाली तुला नाही ओळखू शकलो
तुझ्या मनातील प्रेम मी नाही जाणू शकलो..
अग वेडे किती प्रेम केलेस तू माझ्यावर ..??
त्या प्रेमावर मी खरा नाही उतरु शकलो.
नेहमी माझ्या मागे पुढे फिरालिस,
एक कवच बनुन तू माझ्या पुढ्यात रहिलिस,
प्रत्येक अड़चणिंमध्ये माझ्या सोबत रहिलिस.
तुला मी माझे सर्व सुख दुःख सांगितले,
पण तुला कधीच काही नाही विचारले.
स्वताच्या दुखांना तू लांबच ठेवलेस
माझे दुःख तू स्वताचे समजलेस
स्व दुःख सोडून तू माझ्या सुखात शामिल झालीस
माझ्यासोबत आनंदात बेधुंद रहिलिस ..
मी दुसऱ्या मुलीच्या पाठी फेऱ्या मारत होतो,
तुला आपली एक ख़ास मैत्रिण मानत होतो.
हे सर्व काही तू जाणत होतीस..
मग का ग..?? का तू असे केलेस..??
तुझ्या मनातील माझ्या प्रेमाला का तू लपवलेस?
एकदा तरी मला का नाही सांगुन बघितलेस..??
मी दुसऱ्या मुलीच्या प्रेमात पडल्यावर
का तू असे हे वेगले पाउल उचललेस..???
माझ्या सुखाची तुला एवढी कलाजी होती ना ग,
मग तुला आता काही झाल तर मी राहीन का ग..??
बघ आता मला माझी चुक समजली आहे,
तुझ्या मैत्रीमध्येच खरे प्रेम दडलेले आहे.
मग का तू अशी निजपत पडली आहेस,
मला माहित आहे तू खूप रडली आहेस.
तुला मी नेहमी यापुढे खुश ठेवीन
तुझ्या सुख दुखाना मी आपल मनिन
आता एकदातरी डोळे उघडून बघ ना
उठून लगेच माझ्या कुशीत येउन बघ ना.
मला आता तरी माफ़ कर ना ...
ऐ बघ ना मी आता आलोय..
तुझ्या अन तुझ्याच प्रेमात मी पूर्णपणे न्हालोय...:( :(

लग्न लग्न म्हणजे काय असतं...



पहिल्या नझरेत दोघांनी एकमेकांना

आपलसं करायचं असतं

कांदे पोह्याची डीश संपवत

एकाने दुसर्याला हो म्हणायचं असतं

लग्नात किती ही अबोला असला

तरी डोळ्यांनी डोळ्यांशी बोलायचं असतं

शेवटच्या पंगतीत बसून एका जीलेबित

दोघांनी तोंड गोड करायचं असतं

मधु चंद्राच्या त्या पहिल्या रात्रीत

आपलं भवितव्य आख्यचं असतं

आपल्या माणसाला नुसतं जवळ करायचं नसतं

तर सगळ्यांना आपल्या सुखात सामवून घ्याचं असतं

आपण दिल्येल्या शब्धात नुसतं

अडकून राह्याच नसतं तर

त्या रेशमी बंधनात राहून

आपलं सुख दुखं विणायचं असतं

सगळच जर येवडं सोपं असतं

तरी ही ते आपल्याला एवडं अवघड का वाटतं

आपल्याला एवडं अवघड का वाटतं .....

माझी हि एक प्रेयसी होती..



माझी हि एक प्रेयसी होती.................
निखळ स्वभावाची गालातल्या गालात हसणारी उगीच रागावणारी............
कोल नाही केला तरी मिस्स्कोल देणारी...............
मनात येयील तेव्हा भेटायला बोलवायची ........
तिला भांडायला खूप आवडायचं .....पण मी भेटल्यावर........ ओठान्वारली लाली
.......गालावर मात्र उतरायची.........
तिला ....... मेकप करायला आवडायचं नाही.......मात्र डोळ्यात काजळ लावायला कधी
ती विसरायची नाही........
माझी हि प्रेयसी होती......... मी रागावलो कि मुळमुळू रडायची........ विचारलाच
तर ........मी नाही कोण तुझी अस बोलायची.

माझी हि एक प्रेयसी होती ................. पाउसात चिंब भिजणारी उन मलाही
भिजवणारी .............मग हळूच ........... अरे थंडी तर वाजत नाही न तुला ?? अस विचारणारी
...............................
माझी हि एक प्रेयसी होती.......... माझ्यावर खूप प्रेम
करणारी............................
बागेतली फुल तिला अवदन्या अगोदर फुलांना ती आवडणारी ........... ....... माझी
हि एक प्रेयसी होती...............
चांदण्यात रमणारी............... तला कविता माझ्या आवडत नसल्या तरी
...............फक्त माझ्या कडे पाहता यात म्हणून ......
मला कविता ऐकाव न तुझी अस म्हणणारी .................

कित्ती गोड आहे म्हणून सांगू ती...


कित्ती गोड आहे म्हणून सांगू ती...
एरवी अगदी खळखळून हसते
पण मी हात पकडला की गोड लाजते

जीन्स टी शर्ट regularly घालते
पण पंजाबी ड्रेस वर टिकलीही न चुकता लावते

साडीतले फोटोस आवर्जुन दाखवते
पण मोबाइल मधे फोटो काढतो म्हणालो तर 'नाही' म्हणते

पिज्जा बर्गर सर्रास खाते
चहा मात्र बशीत ओतुनच पिते

लोकांसमोर खुप बोलते
मला i luv u म्हणताना मात्र फक्त same 2 u च म्हणते

ग्रुपमधे असताना खुप बिनधास्त असते
पण माझा विषय निघाला की पटकन बावरते

बोलून दाखवत नसली तरी नजरेने खुप काही सांगते
एवढ नक्की सांगतो माझ्यावर खुप खुप प्रेम करते

ती एक कळी उमलणारी

ती एक कळी उमलणारी
दवबिंदू सोबत हसणारी,
मधुलिकांना खुणावणारी,
भ्रमरांना भुलवणारी,
हृदयी स्वप्न रंगवून
वाऱ्यावर झुलणारी.
ती एक कळी उमलणारी....
क्षणात रुसणारी,
क्षणात हसणारी
स्वच्छंदे जगू पाहणारी,
रिमझिम पावसात चिंब भिजणारी,
ती अवखळ, ती खोडकर,
ती निरागसं , ती सुंदर,
ती एक कळी उमलणारी....

लग्न म्हणजे..


लग्न म्हणजे लग्न म्हणजे लग्न असते
दुरून राजवाडा जवळून बुरुज भग्न असते।।
लग्न म्हणजे हरवलेली छत्री असते
खूप पाऊस पडताना कधीच जवळ नसते।।
लग्न म्हणजे धार नसलेली कात्री असते,
तिची चिमटी मात्र उगीच टोचत राहते।
लग्न म्हणजे चंद्रावरचा डाग असते
वरकरणी शीतल, विवरांमध्ये आग असते।।
लग्न म्हणजे सुगरणीचा भात असते
वर कच्चा, मध्ये ठीक,जळका आत असते।
लग्न म्हणजे संपलेला रॉक असते
मधुर वयानंतरचा कॅटवॉक असते।।
लग्न म्हणजे लपवलेला खजिना असते
प्रत्यक्ष हाती चिल्लर आणा लागते।
लग्न म्हणजे पत्नीने विणलेले स्वेटर असते
नको तिथे नको तेव्हा टोचत राहते।।
लग्न म्हणजे तव्यावरची पोळी असते
ताजी बरी लागते पण लवकर शिळी होते।
लग्न म्हणजे गजबजणारे बेट असते
कविता संपते डिक्शनरी थेर उरते।
तरीही लग्न म्हणजे सहजीवन असते
सजा असते तरीही ती आजीवन असते।

आज खूप दिवसांनी तिच्या आठवणीत माझे मन गुंतले...

मला आता तिच्यामध्ये गुंतायचे नव्हते....
खूप प्रेम करत असली माझ्यावर तरी ,
आता मला ते सर्व काही विसरायचे होते.

खूप प्रेम असूनही तिच्या बद्दल ,
आता मला ते कधी दाखवायचे नव्हते .
माझ्यासाठी फुलणाऱ्या कळीला ,
तू फक्त तुझ्यासाठी आहेस हे सांगायचे होते ....

माझ्याविना तुझा आयुष खूप सुंदर आहे ,
हे तिला आता मला पटउन दायचे होते ,

मी जरी तडपणार असलो तिच्या विना ,
तरी आनंदी राहील तिच्या विना हेच मला सांगायचे होते.

कारण .....
आता मला तिच्या थाटनार्या संसारामध्ये,
डोकावून कधी पाहिचे नव्हते.