कुणाचेच नसतात हक्क

कुणाचेच नसतात हक्क
कोणावर पण तरीही डोळे
भरतातच ना ?
मुळात अपेक्षाच करु नये अशा
पण तरीही आस लागतेच ना ?
हिशोब मांडायचा सारा तर आकडे
पडतील कमी,
तरीही सुख
मोजताना पापण्या भिजतातच ना?
लाख झाला असेल
मनाचा दगड ,तरीही आठवणींनी त्याला पाझर
फुटतोच ना?
तोडताना जोडलेली नाती मनात
वेदना होतातच ना ?
या सगळ्यातनं हाती उरायचे शून्य,
पण तरीही जीव जडतातच ना ?.
कवी- अनामिक 

पाखरे परत येतील साजं टळून गेल्यावर

पाखरे परत येतील साजं टळून गेल्यावर
मेघ दाटून येतील उंन पोळून गेल्यावर
सरी धावून येतील रानं जळून गेल्यावर
सुखही परत येईल दु:खं छ्ळून गेल्यावर.

होतील मार्ग मोकळे वळणं टळून गेल्यावर
शब्द टोचतील मनाला ते बोलून गेल्यावर
भिजतील डोळे तुझेमाझे सुकून गेल्यावर
पुन्हां तु ही परत येशील मी दूर गेल्यावर.
कवी- अनामिक