तुझ्यासाठी काय पण...


एकदा तरी मनापासून विचारायला पाहिजे होतस,
माझ्याशी मैत्री का केलीस म्हणून?
मी उत्तर दिला असता,
माझ्या जीवनात नवीन व्यक्तीचा प्रवेश व्हावा म्हणून...
तुझ्यासाठी काय पण...

एकदा तरी मनापासून विचारायला पाहिजे होतस,
माझ्या सोबत इतका मोकळा का राहतोस?
मी उत्तर दिला असतं,
मला दुसरा जवळची मैत्रीण अशी कोणी नाही म्हणून...
तुझ्यासाठी काय पण...

एकदा तरी मनापासून विचारायला पाहिजे होतस,
मी रागावले तर माझी समजूत का नाही काढत पटकन?
मी उत्तर दिला असतं,
मला हक्काचं असा रागावणारी तूच एक होतीस...
तुझ्यासाठी काय पण...

एकदा तरी मनापासून विचारायला पाहिजे होतस,
माझ्यात तू इतका का सामील होतोस?
मी उत्तर दिला असतं,
तुझा सुख तेच माझा सुख असतं म्हणून...
तुझ्यासाठी काय पण...


एकदा तरी मनापासून विचारायला पाहिजे होतस,
तू माझ्यासाठी इतका सारं का करतोस?
मी उत्तर दिला असतं,
मी तुझ्याशी मैत्री केलीये अन,
तुझ्या मैत्रीसाठी काय पण....

तुझ्यासाठी काय पण...
-कवी- अनामिक 

तिचा मित्र



रिमझिम पाऊस,
त्यात तिच्या भिजण्याची हौस.
मग पावसात भिजताना मला विसरणं,
कधी विसरून पावसाला मला बिलगणं.
 
पावसासोबत ती असताना मला,
आणि माझ्यासोबत ती असताना पावसाला वाटणं गैर.
आणि आणखिनच त्याच माझं वाढत गेलेलं वैर.
 
तिचं मुसमुस रुसणं ,कधी फिकटस हसणं,
तिने ये म्हणताच याने बरसणं,
मग मला येता राग मी तिला छत्रीत घेणं,
तेव्हा मला आवडतं त्याच ते तरसणं.
 
तिचं हसणं, त्याच बरसणं,
माझ्या आधी पोहचता तो, माझं ते धूसमुसनं,
माझं असं फसणं, त्याचं त्याला हसणं,
मग तिनेच उघडून छत्री, माझं राग पुसणं.
 
ती नसताना एक दिवस पाऊस आला खाली,
म्हणतो पुरे झालं धुसफूस आता बास झाली.
अरे तिची माझी जरा वेगळीच विण आहे,
ती तुझी आजकालची पण माझी तिच्या बालपणापासूनची मैत्रीण आहे.
मी दोन क्षण बोललो तर तुला वाईट वाटत.
तू उघडून छत्री तिला जवळ घेतो तेव्हा, माझ्या मनी काय दाटत.
अरे मी चार महिन्याचा पाहुणा आहे,
तरी ऋणानुबंध आमचा फार जुना आहे.
आज मला शेवटचं तिच्यामध्ये मिसळू दे,
उद्या पासून मी नसेन येईल वेगळा ऋतू,
चल जातो मी येईन पुन्हा तोवर शपथ तुला तिला सांभाळ तू.
 
तिची चाहूल लागताच हा निघून जातो,
एक हळवा आसू डोळी माझ्या रहातो,
येऊन ती विचारते "तुला काय झाले",
मी म्हणतो काही नाही "ढग बरसून गेले".
 
मग येतो पाऊस त्याची पुरवण्या हौस,
ती म्हणते उघड छत्री मी सांगतो आज नको मागुस,
ते ऐकून पाऊस आनंदात बरसतो,
डोळा मारून मला गालातल्यागालात हसतो.
 
आता आठवत राहत ते त्याचं कोसळणं,
त्याच्यासोबत  तिचं ते हसणं कधी रुसणं,
पण आता छळत राहत हि असताना ते त्याचं नसणं.
कवी - अनामिक 

तू आणि मी फक्त तू आणि मी बाकी कोणीच नाही!


तू आणि मी फक्त तू आणि मी  
बाकी  कोणीच  नाही! 
माझी  तू  नि  तुझा  मी! 
तू  दूर  जाताना  तुझा  हात  पकडून  
तुला  जवळ  घ्यावे  मी 
कडाडू  दे  सारे  आभाळ  
आणि  बरसू  दे  मेघमल्हार 
तू  घाबरशील  अन बिलगशील मला... 
तुला  घेईन  मिठीत  मी! 
तू  पाहशील  माझ्याकडे  
अन  तुझ्याकडे  पाहीन  मी 
गहिवरू  दे  श्वास...  
आणि  संपून  जावू  देत  सारे  आभास 
विसरून  जावू  जगाला  जेव्हा.... 
तुझ्या  ओठांना  स्पर्श  करतील  ओठ  माझे 
लागू दे  आग पेटू  दे  ठिणगी  जेव्हा... 
भिजलेल्या  तुला  पाहतील  डोळे  माझे 
वारा सोसाट व्हावा  अन 
पानाफुलांची  बरसात व्हावी 
मी  तुला  उचलून घ्यावे
अन तू  लाजावे 
मग तू  आणि मी प्रेमरसात भिजून 
चिंब ओले व्हावे... 
कवी- अनामिक 

ते तुझे हसणे नव्हते


ते तुझे  हसणे  नव्हते 
ते नशिबीच  पडले होते 
दारिद्र्य लाभले मज 
आयुष्यही दुखांनेच घेरले होते ....

खरेच शोना माझ्या ह्या दारिद्र्यात  
तुझा ही हाथ सुटणारच आहे ....

तू   जाशीलही  निघून 
ही वेळच  तशी आहे 
सगळे  सोडून  गेल्यावर 
मला तूच किती वेळ सांभाळणार आहे ......

तुझे सुख तुला मिळावं 
आजवर दुसरं काहीच  स्वप्नी नव्हतं
आजही देवाकडे हाथ जोडून 
तुला सुखी ठेवच म्हणणार आहे .......

खरेच शोना माझ्या ह्या दारिद्र्यात  
तुझा ही हाथ सुटणारच आहे
एकटा आलो  इथवर  अन  मी 
आता एकटाच  विरहात जाळणार आहे  ....

खरेच शोना माझ्या ह्या दारिद्र्यात  
तुझा ही हाथ सुटणारच आहे....
-
©प्रशांत डी शिंदे


उगाच मी उन्हातली फ़ुले मनात आणली


उगाच मी उन्हातली फ़ुले मनात आणली
क्षणात गारव्यातली सुखे उन्हात आणली ..

पुरेल हीच पानगळ पुढे मला हयातभर
फ़ुलायची उमेद तू अशा वयात आणली !..

नसेन मांडली कथेत वेगळी व्यथा जरी 
तिला न कोणत्याच मी कथानकात आणली !..

बघून पारिजातका दवातला सडा तुझा 
कधी न आर्जवे पुन्हा तुझ्या पुढ्यात आणली !..

नको विचार एवढा करू मना मनातला
तुझी न कल्पना कधी कुणी मनात आणली !..

अता कसे लढायचे पराभवा तुझ्या पुढे ?
तहातलीच जिंदगी रणांगणात आणली !..

निमूट भोगली तुझ्या समोर जन्मठेप मी 
कधी न कोणती सजा तुझ्या गुन्ह्यात आणली..
कवी - अनामिक