संकटाना कधी कंटाळायच नसत

संकटाना कधी कंटाळायच नसत
त्याला सामोरे जायच असत !
कुणी नाव ठेवली तरी थांबायचं नसत
आपल काम चांगलच करायच असत !
अपमानान कधी खचायच नसत,
जिद्दीने बळ वाढवायच असत .
निराश मुळीच व्हायच नसत .
चैतन्य सदा फुलवायच असत
पाय ओढले म्हणून परतायचं नसत
पूढे आणि पुढेच जायचं असत
लोकनिंदेला कधी घाबरायच नसत
आपल सामर्थ दाखवायच असत
जीवनात खूप करण्यायोग असत !
पण आपल तिकडे लक्षच नसत
रागाने कोणाला बोलायचं नसत
प्रेमाने मन जिंकायच असत !
प्रेमाने लहान थोर पहायच नसत
एकमेकांना आधार देऊन, मार्गदर्शन करायचा असत !
-अनामिक 

No comments: