एकदा डोल्यांतल्या एका अश्रुने

एकदा डोल्यांतल्या एका अश्रुने
दुस-याला विचारले......

'ए आपण असे कसे रे
ना रंग, ना रूप,
नेहमीच चिडीचुप,
आनंद झाला तरी डोळ्यातुन
बाहेर,

दु:खाच्या प्रसंगीही दुराव्याचा
आहेर,
कोणीच कसे नाही थांबवत
आपल्याला,
किनारा ही नाही साधा या
पापण्याला............

दुस-यालाही मग जरा प्रश्न
पडला,
खुप विचार करून तो बोलला,

रंग-रूप नसला तरी,
चिडीचुप असलो जरी,
आधार आपण भावनांचा,
आदर राखतो वचनांचा,
सान्त्वनांचे बोल आपण,
अंतरीही खोल आपण,

सुखात आपले येणे व्यक्तिपरत्वे,
दु:खाच्या प्रसंगी आपलेच
महत्व,

आपल्याला नाही कोणी थांबवु
शकत,
बंधनात नाही कोणी बंधवु शकत,

उद्रेक आपण मनातील वेदनांचा,
नाजुक धागा वचनातील बंधनांचा,
भावबंध ह्र्दयातील रुदनांचा,
स्वरबद्ध झंकार तनातील
स्पंदनांचा ,

म्हणुनच,
आपले बाहेर पड़णे भाग आहे,
आपल्यामुळेच आज हे जग आहे.
अशीच आपली कहाणी.........

ऐकून ही अश्रुंची वाणी
अश्रुच्याच डोळ्यांत आले
पाणी...
 
 
 
-अनामिक 

No comments: