मैत्रीच नात

संकट हि आयुष्याला जगण्याच बळ देतात,माणस सुद्धा संकटातच आपली खरी ओळख दाखवतात !
नातीगोती फक्त रक्ताचीच नसतात,
त्या हि पलीकडे हि मैत्रीची नाती असतात !!

सूर्य ढगाआड गेला कि सर्व काही बदलत,
आपली माणस सुद्धा कधी परक्या सारखी वागतात !
आपल्या डोळ्यातून आसव ढळत असतानाही,
कधी - कधी ती बेधुंद आनंदाने नाचतात !!

दोन पावलं एकट चालल्यावर मला कळाल,
स्वतःची सावली सुद्धा अंधारात साथ सोडत असते !
किती हि मोठा झाला माणूस तरीही,
शेवटी माणुसकी शिवाय शिल्लक काहीच उरत नसते !!

दोन सेकंदात आता हृदय जग सोडणार होत,
तेवढ्यात एका हाताने मला पुन्हा सावरल होत !
मी तर पूर्णतः स्वतःला संपवलाच होत,
थांबलेल्या श्वासाला त्याने पुन्हा का जाग केल होत ?

मैत्रीच्या नात्याला न रक्ताची गरज असते,
नाही त्याला कोणत्या गोष्टीची हाव असते !
हे नात फक्त दोन हृदयाचा ठाव असते,
खरंच जग संपेल हे कधी ,
पण मैत्रीच नात हे कधीच संपणार नसते !!
- संग्रहित

No comments: