भयानक अपघात.........

काल रात्री श्रीरामपूर येथे आमच्या घराशेजारी राहणाऱ्या श्री. जग्गी यांच्या इथे लग्न होते. पंजाबी असल्याने लग्न रात्री ९.३० चे होते (लागले १०.३० ला तो भाग वेगळा). श्रीरामपूर राहुरी पासून फक्त २५ किलोमिटर असल्याने गल्लीतल्या मित्रमंडळींनी बाईक वरच जाण्याचा प्लॅन केला होता. दिवसभर प्रत्येकाने प्रत्येकाला फोन करुन वेळ ठरवली, साडेसातला निघायचे ठरले. त्याप्रमाणे सुहास, अतुल, मिल्या वगैरे वगैरे जमले. गल्लीतले लग्न असल्याने ऐन वेळी मी पण येतो म्हणणाऱ्यांची संख्या वाढू लागली. बाईकस कमी, इच्छूक जास्त असल्याने व रात्री उशीर होणार असल्याने सर्वांच्या घरचे ओरडले. मग अतुलने ट्रक्स काढली, जास्त गर्दी होवू नये म्हणून आमच्या मर्जीतले व ग्रुप (टोळी नव्हे) मधले सदस्य घेवून बाकीच्यांना कल्टी मारुन पुढे निघुन गेलो (त्यांना काय डोक्यावर बसवता काय?). अर्ध्या-पाऊन तासांचा रस्ता एकमेकांचे राहुरी स्टाईल मध्ये 'माप' कढता कढता पाचच मिनीटांत श्रीरामपूर आले असे वाटले. कार्यस्थळी उतऱ्यावर लग्नाला वेळ आहे असे समजल्यावर थोडं फीरुन आलो. लग्न लागल्यावर जेवणंही (महत्वाचे) आटोपले. निघायच्या तयारीत असतांना एकचा मोबाईल खणख़णला, त्यावरुन राहुरी कॉलेजच्या पुढे पल्लवी ढाब्याजवळ 'ऍक्सिडेंट' मध्ये ४ जण जागेवर गेल्याचे समजले. दोनच दिवसांपूर्वी राहुरी कारखान्याजवळ झालेल्या अपघातातहि ४ जण मरण पावले होते, दोनच दिवसांत पुन्हा त्याच रस्त्यावर अपघात झाल्याचे समजताच सर्व हळहळले. नाहि म्हणता म्हणता ब्रेकिंग न्यूज सगळिकडे पसरली, राहुरीलाही पोहोचली.
ज्याच्यात्याच्या घरून काळजीचे फोन्स येवू लागले. आम्ही परतीच्या मार्गाला लागलो, त्या दरम्यानही काहिजण आमच्या गाडित घुसखोरी करण्याच्या टाऊकवर होती, परंतु आमची मित्रमंडळी 'थर्ड' मारण्यात तरबेज असल्याने जेवढे जाताना होतो तेवढेच येतांना निघालो. 'काळजीचे' फोनं चालुच होते. राहुरी तुन प्रेसचे प्रत्येक वर्तमानपत्रास फोटो ई-मेल माझ्याकडूनच होत असल्याने मला पत्रकारांचे फोन्स येवू लागले. मरण पावलेल्यांचा आकडा ९ वर गेला होता.
१५-२० मिनीटांत आम्ही घटनास्थळी पोहोचलो. नुकत्याच 'बॉडीज हलविण्यात आलेल्या होत्या. फोटोग्राफर्स ची फ्लॅशींग चालू होती, गर्दी ही मदत करुन मोकळी झाली होती, प्रत्येक जण तावातावाने 'अनुभव' सांगत होता. दोन्ही गाड्यांचा चुराडा झालेला होता, आसपास रक्ताचा थारोळा पडला होता, प्रवाश्यांचे सामान विखुरलेले होते... रक्त बघुन एकाला भुरळ आली तर एकाला 'उल्टी' झाली. आसपास गाड्यांच्या काचेचा खच पडलेला होता... आम्ही नियतीचा खेळ बघुन खिन्न होवून गाडित बसून घरी आलो. सार्वमतला व लोकसत्ताचे फोटो जात नव्हते, ते मी रात्री १२.१० ला पाठविले, सार्वमतला कंफरमेशन फोन चालू असताना सुहास कॉलवेटींग मधे होता, त्याला माझा फोन झाल्यावर फोन केला, त्यानी ई-टि व्ही ला फोन करुन माहिती दिली होती, ती ब्रेकींग न्यूज बघण्यासाठी त्यानी फोन केला होता. त्या दिवशी लवकर झोप लागलीच नाहि. घटनास्थळावरची द्रुश्ये डोळ्यासमोर येत होती......... निलेश.

16 comments:

Anonymous said...

hi nelesh nice to see ur blog again just read your "kavita" & now this blog ! I am from shrirampur. vidyadhar

pooja said...

hi nilesh ha apghat kharcha khup bhayanak hota kharacha niyati kadhi kadhi vichar karayala bhag padte ani aaplya aayushyat kadhi kay honar yachi janiv pan aaplyala nasate.

Anonymous said...

Nilesh tujha ha blog khoob masta aahe.. tujha kavita padn khoob chhaan.. keep up ur good work, it helpe me a lot��

Anonymous said...

It was scary but nice one you got there!!!!!

Unknown said...

Nice one

Unknown said...

सर चाचांगल12वी चे निबंध पाठवा ना

Unknown said...

Anything different

Unknown said...

Nice one

Unknown said...

Thank you

Anonymous said...

Nice

Unknown said...

Heart touching story

Unknown said...

भयानक आहे

Unknown said...

Aabhyasa la kamala aala

Unknown said...

Nice

Unknown said...

Very nicee👍

Unknown said...

Thanks you sir