नभभर पसरल्या,दाट धुक्यांच्या ह्या शाली,
पाऊले न वाजविता,तुझी आठवण आली…
तुझ्या अवखळ मनाची, श्वास श्वास सांगे कथा,
किती बरसला तरीही, न मनमेघ होई रिता,
कसा आवरु मनाला, या गूढ संधिकाली,
पाऊले न वाजविता,तुझी आठवण आली…
गालावरच्या बटांना, नको आवरुस सखे, काय बोलावे कळेना, होती शब्द इथे मुके,
तुझ्या रुपवर्णनास, कमी शब्दांच्या पखाली, पाऊले न वाजविता,तुझी आठवण आली…
कधी सरणार सये, तुझ्या माझ्यातले अंतर,
जाणवावे सखे तुला, कधी माझेही अंतर,
जेव्हा भेटशील मला, मी होईन भाग्यशाली,
पाऊले न वाजविता,तुझी आठवण आली…
तुझ्या अवखळ मनाची, श्वास श्वास सांगे कथा,
किती बरसला तरीही, न मनमेघ होई रिता,
कसा आवरु मनाला, या गूढ संधिकाली,
पाऊले न वाजविता,तुझी आठवण आली…
गालावरच्या बटांना, नको आवरुस सखे, काय बोलावे कळेना, होती शब्द इथे मुके,
तुझ्या रुपवर्णनास, कमी शब्दांच्या पखाली, पाऊले न वाजविता,तुझी आठवण आली…
कधी सरणार सये, तुझ्या माझ्यातले अंतर,
जाणवावे सखे तुला, कधी माझेही अंतर,
जेव्हा भेटशील मला, मी होईन भाग्यशाली,
पाऊले न वाजविता,तुझी आठवण आली…
-आदित्य चंद्रशेखर
No comments:
Post a Comment