तुझी आठवण आली…

नभभर पसरल्या,दाट धुक्यांच्या ह्या शाली, पाऊले न वाजविता,तुझी आठवण आली…
       तुझ्या अवखळ मनाची, श्वास श्वास सांगे कथा,
       किती बरसला तरीही, न मनमेघ होई रिता,
       कसा आवरु मनाला, या गूढ संधिकाली,
       पाऊले न वाजविता,तुझी आठवण आली…
गालावरच्या बटांना, नको आवरुस सखे,
काय बोलावे कळेना, होती शब्द इथे मुके,
तुझ्या रुपवर्णनास, कमी शब्दांच्या पखाली,
पाऊले न वाजविता,तुझी आठवण आली…
       कधी सरणार सये, तुझ्या माझ्यातले अंतर,
       जाणवावे सखे तुला, कधी माझेही अंतर,
       जेव्हा भेटशील मला, मी होईन भाग्यशाली,
       पाऊले न वाजविता,तुझी आठवण आली…
-आदित्य चंद्रशेखर

No comments: