तूच दिली हि सुंदर धरणी , अमुल्य अक्षय ठेवा
कसे करंटे आम्ही निपजलो , दोष तुझा ना देवा
सागर जंगल नदी नी नाले , जे जे होते छान
विकास करुया म्हणता म्हणता, केले आम्ही घाण
तुझ्याच सुंदर आकाशात , आमचा काळा धूर
हद्दपारही पक्षी झाले , गेले मंजुळ सूर
उधळत लाखो गाडी फिरते, अडकून पडती श्वास
माथेफिरू हा मानव झाला, त्याचमुळे हा त्रास
प्लास्टिकचे तर पर्वत झाले , हीच खूण नाशाची
विनाशरूपी जुगलबंदी ही , ढोल आणि ताशाची
ओरबडूनी घेता घेता , आलेच संकट माथी
बेफिकीर जर असे राहिलो , उरेल शून्यच हाती
आम्हास भवली आमची वृत्ती, देवा करशील माफ ?
की उघडोनी तिसरा डोळा , करशील पृथ्वी साफ ?
-अनामिक
No comments:
Post a Comment