का होतं मन असं हळवं

का होतं मन असं हळवं
कोणाच्या तरी आठवणीने ?
एक एक क्षण का वाटे युगासमान,
तिच्या  दूर जाण्याने ?

भेटीनंतरही का .....
भेटण्याची आस असते ?
तिच्याच गोड स्वप्नांमध्ये
का रात्र सारी हरवते ?

तिने फक्त आपल्यालाच पहावं,
आपल्याशीच बोलावं..
असं काही वाटू लागतं
प्रत्येक छोटी गोष्ट ही
तिलाच  सांगावी म्हणून मन आतुरतं

कळलं का तुम्हाला, अचानक
असं वेड्यासारखं का होतं ?
दुसरं काही नाही .........
यालाच तर  " प्रेमात पडणं " म्हणत नसतील?
--अनामिक 

No comments: