किनारा म्हणाला लाटेला,

किनारा म्हणाला लाटेला, 

नेहमीच का ग अशी घाईतच येतेस ?

... ... तहानलेले माझे अंग चिंब भिजवून जातेस

माझ्या जवळ थांबायला तुला कधीच नसतो वेळ
का बर खेळतेस माझ्याशी असा जीवघेणा खेळ ?

तुझ्यासाठीच तर मी वाट पाहतो भरतीची
तुला मात्र नेहमीच घाई असते परतीची ?

लाट म्हणाली किनाऱ्याला

तुझ बर आहे रे काठावरती तू आरामात बसतोस
थांबत नाही तुझ्याजवळ म्हणून माझ्यावरच रुसतोस ?

तुझ्याजवळच थांबाव अस मलाही खूप वाटत
धावून धावून बघ ना माझ पाणी किती आटत ?

परतले घाईने तरी पुन्हा तुझ्याकडेच ना येते ?
कितीही थांबवलं स्वत:ला तरी मन तुझ्याकडेच धाव घेते ..

No comments: