राहीलयं काय आता ..............

लाख वाटल लपवाव या मनाला
तरीही आज तुझी कहाणी कळाली या जगाला
सगळ्यांनी वाचल दुःखं या प्रत्येक शब्दांतुन
काय लपवु राहीलयं काय आता लपवायला.....

लाख मन सागंत होत कुठेतरी थाबांयला

वळण निघुन गेली नाही जमल वळायला
सारेच धावले एकदम सुखाच्या मागे
मी काय करु मला नाही जमल पळायला........


आज काय झाल तुला उगाच असं रडायला
कुठे चुकल्यासारखं नाही ना वाटत मनाला
अशी कीती सुखं तुझ्या पदरात पडली
जी कारणं होती तुझी तेव्हा मला सोडायला..........


आजही कुठे जमतय मला तस जगायला
एक वणवा कमीच होती मला जळायला
कालच्या पुरातून कसाबसा वाचलो मी पण
डोळ्यातल्या पाण्यात नाही जमत पोहायला........


स्वप्नांच दार कधीच बंद नसत,
उशीरा गेलात तरी तिकीटाच बंधन नसतं.
स्वप्न हि नेहमीच आपली असतात
तुटली तरी पुन्हा नविन दिसतात. 


वजा झालेल्या गणिताची काळजी कशाला
तयार रहा येणारया नव्या बेरजेला !

No comments: