माझ्या वहीच शेवटच पान


शेवटच पान
माझ्या वहीच शेवटच पान
मी कोरच ठेवलय
कधीतरी तू येशील आणि
कविता लिहिशील म्हणुन...
दबलेल्या ओठातुन,
झुकलेल्या नजरेतुन आणि
थबकलेल्या लेखणीतुन
केव्हा तरी...
तू तस सुचवल होतस म्हणुन...
पान भरन्यासाठी पुष्कलानी
पुष्कल कवीता दिल्या
पण शेवटल पान मी कोरच ठेवल
तुझीच कविता हवी होती म्हणुन...
आयुष्यभर जपेन म्हणत होते
तुझी कविता...
आयुष्याच्या उतार चढावावर
सोबत बरी होती
जीवापाड जपन्याएवढी जीवघेणी होती...
पण संधीच दिली नाहीस
तुझी कविता पेलायला असमर्थ वाटले?
की अयोग्य वाटले?
काहीही असो,
तू सुचवल होतस म्हणुन सांगते
तुझ्या कवितेसाठी म्हणुन
माझ्या वहीच शेवटच पान
मी कोरच ठेवलय............

No comments: