फुले शिकवतात

गुलाब सांगतो, येता जाता रडायचं नसतं,
काट्यात सुध्दा हसायचं असतं;

रात रानी म्हणते, अंधाराला घाबरायचं नसतं,
काळोखात ही फुलायचं असतं;
सदाफुली सांगते,
रुसुन रुसुन रहायचं नसतं, हसुन हसुन हसायचं असतं;
बकुळी म्हणते,
सवळ्या रंगाने हिरमुसायचं नसतं, गुनाच्या गंधाने जिंकायचं असतं;
मोगरा म्हणतो,
स्वत:चा बडेजावपणा सांगायचा नसतो, सदगुनांचा सुगंध मैलवरुन हीयेतो;
कमळ म्हणतो,
संकटात चिखलात बुडायचं नसतं, संकटांना बुडवुन फुलायचं असतं........
 
- अनामिक 

No comments: