आधी मन जिंकता आले पाहिजे

जिंकता येते सहज जगाला
आधी मन जिंकता आले पाहिजे

मार्ग नक्कीच काढता येतो
आपल्याला पुढे जाता आले पाहिजे

विसरता नक्की येते दू:खाला
विसरून स्वताचे जगाकडे पाहता आले
पाहिजे

दू:खात ही सुख नक्की भेटते
इतरांचे दुःख ही जानता आले पाहिजे

नक्कीच तिरस्कार करावा पापाचा
आपल्याला पुण्यवान होता आले पाहिजे

दुसर्याला समजावने खुप सोप्पे
आपल्याला स्वताला तसे जगता आले पाहिजे..
- अनामिक

No comments: