सालं कळतंय सारं , पण वळतंच नाही.

अभ्यासाचं असाव कर्तव्य आध्य.
होईल जीवनात सार कांही साध्य.
गुंजतो हा संदेश सदा दिशा दाही.
सालं कळतंय सारं , पण वळतंच नाही.

आळसाशी नसाव कदापी मैत्र.
तयान जीवनाचं बिघडत सूत्र.
प्रगतीचा मार्ग मग खुंटतच जाई.
सालं कळतंय सारं , पण वळतंच नाही.

वेळेच महत्व पार पैशांसमान.
जर पाळलं तयाच व्यवस्थापन.
करून वेळेत होईल सारच सही.
सालं कळतंय सारं , पण वळतंच नाही.

असेल व्यायाम,प्राणायाम, योग नित्य.
मन:शांती सुआरोग्याची नसेल खंत.
मग बुवा अन वैध्यांची फिकीरच नाही.
सालं कळतंय सारं , पण वळतंच नाही.

आता वाईट सवयींची गुलामी सोडू,
अन गांभीर्याशी नित्य नात जोडू. 
मग कधी म्हणायची गरजच नाही.
सालं कळतंय सारं , पण वळतंच नाही.
 

1 comment:

बाळासाहेब तानवडे said...

धन्यवाद मित्रा माझी कविता share केल्याबद्दल.