मी हि कधी कुणाच्या प्रेमात होतो,

मी हि कधी कुणाच्या प्रेमात होतो,
माझ्यावरहि कुणाचं नियंत्रण असायचं.

नकळत का होईना मी हि हरवून जायचो,
कधी कधी तर वेळेचाहि भान विसरून जायचो.

दिवसभराच्या कामात एकदा तरी फोन करायचो,
हळूच का होईना पण "I Love U" म्हणायचो.

नाहीच Phone तर Miss Call तरी द्यायचो,
रात्री तशी सगळ्यांची झोपण्याची वेळ,
पण मी मात्र SMS -SMS खेळत राहायचो.

सगळंच आता भूतकाळात विरून गेलं,
माझं प्रेम माझ्यापासून दुरावून गेलं,

जाता जाता मला खूप वेदना दिल्या,
पण माझं प्रेम कधी व्यर्थ नाही गेलं.

जाता जाता खूप काही शिकवून गेलं,
किती तरी नाती आपण गृहीत धरतो त्यांचं अस्तित्वच आपण Assume करतो.

समजत नाही कधी मोल नात्यांचं आणि मग दुख करतो ते दुरावल्याचं आज खरंच समाधान वाटतंय कि मी हि कधी प्रेम केलं होतं.

खरंच माझं प्रेम व्यर्थ न्हवतं,
जाता जाता मला जगण्याच्या जवळ घेऊन गेलं.

No comments: