आयुष्य हे असच असतं,
कधी फुंकर तर कधी वादळ असतं.
कधी सुखाची शाल ओढून,
दु:ख दबकत येत
तर कधी दु:खाचे काटे लावून,
सुख धावत येत.
सुखाचा उपभोग घेताना,
दु:ख कधी आलं हे कळत नाही
अन दु:खाचे काटे टोचत असताना,
सुखाची वाट साहवत नाही.
सुख नेहमी पाहुणा बनून येत,
दोन दिवस राहून लगेच निघून जातं
दु:ख मात्र कायमचा पाहुणा बनून येत,
अन हृदयाला चरे पाडून जातं.
पण आयुष्यात दोन्हीच महत्व तितकच आहे,
एक पोळणार उन तर दुसरी गडद सावली आहे.........
कधी फुंकर तर कधी वादळ असतं.
कधी सुखाची शाल ओढून,
दु:ख दबकत येत
तर कधी दु:खाचे काटे लावून,
सुख धावत येत.
सुखाचा उपभोग घेताना,
दु:ख कधी आलं हे कळत नाही
अन दु:खाचे काटे टोचत असताना,
सुखाची वाट साहवत नाही.
सुख नेहमी पाहुणा बनून येत,
दोन दिवस राहून लगेच निघून जातं
दु:ख मात्र कायमचा पाहुणा बनून येत,
अन हृदयाला चरे पाडून जातं.
पण आयुष्यात दोन्हीच महत्व तितकच आहे,
एक पोळणार उन तर दुसरी गडद सावली आहे.........
No comments:
Post a Comment