हरवलेल्या साखळ्या मनाच्या



भूतकाळ कितीही जूना असला तरी तो कधी विसरला जात नाही
डोळ्यासमोर तो येऊन उभा राहिल्यावर डोळ्यातले पाणी संपत नाही
पृथ्वी गोल आहे हे तेव्हा एकदा जरूर लक्षात येत 
जेव्हा भूतकाळातल प्रेम आपल्यासमोर येऊन उभ असत 
सगळ्यात जास्त दुःख तर तेव्हा होत 
जेव्हा त्याच्या हातात हात घालून कोणी दुसर उभ असत 

भातुकलीचा खेळ कधी खरा होतच नाही 
मनात रंगवलेली स्वप्न कधी खरी होतच नाहीत 
राग कितीही असला तरी आज प्रेमही मनात येत 
कधीतरी चुकून वाटत की आपलच काहीतरी चुकल 

हा भूतकाळ नेहमी नको तेव्हा समोर येतो 
मोठ्या मेहनतीने बनवलेलं मनातल हे काचेच घर 
क्षणात तोडून मोकळा होतो ....

No comments: