एका सागराची कथा


एकदा काय झालं
एक सरिता रागावली
आपल्या बॉयफ्रेंडला  म्हणाली
हे रे काय सागर !
मीच का म्हणून ?
दर वेळी मीच का
मीच का खाली यायचं डोंगरावरून ?
आणयच  रानातला सार तुझ्यासाठी
दरी बघायची नाही
कडा बघयचा नाही
कशी सुसाट पळत येते मी
विरहव्याकूळ संगोमोक्त
कधी एकदा तुला गच्च मिठी मरीन
तुझ्यात हरवून, हरपून  जाईन
आणि तू वेडा
तुझं लक्षच नसतं कधी
सारखा  त्या चंद्रिकेकडे टक लाऊन असतोस
उसळतोस तिच्यासाठी
तुझ्यासाठी पाणी आणते मी
पण तुला भारती येते तिच्यासाठी 
मी नाही जा !
बोलणारच नाही आता
येणारच नाही
काठावरच्या लोकांना सांगून
मोठ्ठा  धारण बांधीन
थांबून  राहीन तेथेच
बघच मग
सरिताच ती बोलल्या प्रमाणे वागली
सगर बिचारा  तडफडला
आकसला आतल्या-आत झुरत गेला
शेवटी फुटला बंध त्याच्याही संयमाचा
उठला तड, ओरडला दहाड
उफळला वारा  पिऊन
लाटांच तांडव घेऊन
सुटला सुसाट सरितेच्या देशेने
लोक वेडे
म्हणाले सुनामी आली! सुनामी आली!

....................कवी अज्ञात......................

No comments: