आज तिचा फोन आला ,,




 आज तिचा फोन आला ,,

 शब्दाऐवजी अश्रूंच्या हुंद्क्याचा आवाज झाला ,, 

 स्वतःला सावरून तिन सांगितलं ,अरे माझ लग्न ठरलं ,,

 ती सावरली पण तो क्षणात ढासळला ,,

 अन मग दोघ्यांच्या आसवांपुढे पावसाचा वर्षाव कमी वाटू लागला ,,

 ... शब्द सगळे हवेत विरले.,,

 ती म्हणाली माफ करशील ना रे मला ??

 तो म्हणाला आपराध्यासारखी माफी का मागतेस ?

 कर्तव्यापुरती करून तू आई वडिलांचा मन राखतेस ,,

 या जन्मी नाही झालीस माझी ,,

 तरी पुढच्या जन्मी तुझ्यावर फक्त माझा हक्क असेल ,,

 ऐकून म्हणाली हृदयाच्या कप्यात आठवनीच्या कोपऱ्यात फक्त तुझी प्रतिमा असेल ,,

 धीर देऊन त्याने तिचा फोन ठेवला,,

 कुणाला अश्रू दिसू नयेत म्हणून पावसात जाऊन उभा राहिला ......

No comments: