कोणी सोबत नसल तरी,तरी तो माझ्या सोबत असतो,झालेच...

कोणी सोबत नसल तरी,तरी तो माझ्या सोबत असतो,झालेच कधी दु:ख अनावर,तर येउन हलकेच अश्रु पुसतो .
कोणी नाही म्हणून काय झाले, "मी आहे ना " म्हणतो,कितीही जण असतील सोबत तरी,तोच एकटा मला जाणतो .

कधी आनंदाची उघडून कवाड, मी जाते दुस-यापाशी,पण ते रमलेले त्यांच्याच विश्वात पाहून, मी परत येते होते तशी .

मग तो म्हणतो,"उदास नको होऊ, मी आहे ना तुझ्याजवळ,सांग मला तुझा आनंद,माझ्यात विरून जाइल तुझी कळ " .

कधी एखादा क्षण हळवा,भिजवतो डोळ्याची पापणी,ओघळले जरी लाख अश्रु,पुसाया नसते कोणी ,

मग परत जवळ येतो तो,माझे अश्रु वाटुन घेतो,शब्दानच्याही पलीकडचा आनंद,ओंजळीत माझ्या देऊन जातो.

कधी येतो खुप राग,पण हक्काच माणूस नसत काढायला,उधाणलेल्या त्या सगारामधून,मला किनारी आणून सोडायला .

पण अशा वेळी माझ्याबरोबर, खुप खोल तो येतो ,करुन माझे सांत्वन ,हळूच मिठीत त्याच्या घेतो .

कधी चलबिचल होते मनाची,वाटते खुप अस्वस्थ,पण बोलायला समोर कोणीच नसत, सगळे आपल्याच विश्वात मस्त .

तेंव्हा मन माझे जाणायाला,तो माझ्या जवळ येतो,झेलुनी दु:ख अंतरीचे,मला बोलकेपण तो देतो.

कधी ओथंबतात भावना,अन अडतात मनाच्या दारी,साचून राहतात तशाच मनी,जरी सोबत असतील सारी.

अशा वेळी त्याच्या मनाचे दार,तो माझ्यासाठी उघडतो ,मग मानून समाधान,मनाचा पारवा त्यातच बागड़तो .

वाटत असेल वाचताना,खरच कोण असेल तो ?एवढा सांभाळून घेणारा,खरच खुप गुणी दिसतो .

पण खरतर ह्या जगात,कोणीच कोणाच नसत,असेलच कोणी सोबत तर,केवळ मृगजळच असत.

म्हणुनच मी स्वीकारली सोबत त्याची,खात्री आहे मला तो कधी नाही सोडणार ह्याची .

कोणाला पटेल किंवा नाही पटणार कुणा,आयुष्यभर अन आयुष्यानंतर सोबत राहील " माझा एकटेपणा "

आयुष्याच्या वाटेवरती मी खुपदा अडखळले ,रस्ता वाळणाचा होता जरी, सोबत होते सगळे.

पण राहिला अखंड सोबत, तो माझा एकटेपणा,व्यापुनी सारी धरती , त्याने जिंकले आहे मना.

लोकाना नको वाटतो एकटेपणा,पण तोच खरा सोबती,क्षण दोन क्षण सोबत देणारी, सारी खोटी असतात नाती .

कितीही आली संकट, तरी नाहीं झीजणार ज्याचा कणा,असा माझा अखंड सोबती , " माझा एकटेपणा "!!!!!!!

No comments: