लग्न लग्न म्हणजे काय असतं...



पहिल्या नझरेत दोघांनी एकमेकांना

आपलसं करायचं असतं

कांदे पोह्याची डीश संपवत

एकाने दुसर्याला हो म्हणायचं असतं

लग्नात किती ही अबोला असला

तरी डोळ्यांनी डोळ्यांशी बोलायचं असतं

शेवटच्या पंगतीत बसून एका जीलेबित

दोघांनी तोंड गोड करायचं असतं

मधु चंद्राच्या त्या पहिल्या रात्रीत

आपलं भवितव्य आख्यचं असतं

आपल्या माणसाला नुसतं जवळ करायचं नसतं

तर सगळ्यांना आपल्या सुखात सामवून घ्याचं असतं

आपण दिल्येल्या शब्धात नुसतं

अडकून राह्याच नसतं तर

त्या रेशमी बंधनात राहून

आपलं सुख दुखं विणायचं असतं

सगळच जर येवडं सोपं असतं

तरी ही ते आपल्याला एवडं अवघड का वाटतं

आपल्याला एवडं अवघड का वाटतं .....

No comments: