कधी लिहिल्यास का रे माझ्यावर दोन तरी ओळी..?
मी म्हणतो...
अगं, शब्दच नीःशब्द होतात तुझा विचार करते वेळी...
ती विचारते...
सांग, एकांतात कधी होतात का रे तुला भास माझे..?
मी म्हणतो...
अगं, एकटा असतानाही चालतातच की श्वास माझे...
ती विचारते...
सांग, डोळे मिटून घेतल्यावर मी तुला दिसतेच कशी..?
मी म्हणतो...
अगं, मग पाऊस नसतानाही तू चिंब भिजतेस कशी..?
ती विचारते...
सांग, कधी तरी येते का रे तुला माझी आठवण..?
मी म्हणतो...
अजून तरी बंद नाही पडले माझ्या हृदयाचे स्पंदन...
No comments:
Post a Comment